Home » बॉलिवूडमधील ‘या’ जोड्यांचे घटस्फोट सर्वात जास्त गाजलेले आणि चर्चेत ठरले

बॉलिवूडमधील ‘या’ जोड्यांचे घटस्फोट सर्वात जास्त गाजलेले आणि चर्चेत ठरले

by Team Gajawaja
0 comment
divorce
Share

बॉलिवूडमध्ये नाते जुळणे आणि नाते तुटणे खूपच सामान्य आहेत. अनेक जोड्या अशा आहेत ज्यांनी अनेक वर्ष नात्यात राहून मग एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे तर काही जोड्यांनी देखील अनेक वर्ष संसार एकत्र केला आणि नंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सध्या बॉलिवूडमधील निर्माता आणि अभिनेता असलेल्या सोहेल खानने घटस्फोट घेण्याचे जाहीर केल्याने मीडियामध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे. सेलिब्रिटींसाठी खूपच सामान्य असलेल्या या गोष्टी सामान्य लोकांसाठी खूपच जास्त महत्वाच्या आणि आयुष्य बदलवणाऱ्या ठरतात. सोहेल खान आणि सीमा खान यांनी लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनी घटस्फोट (divorce) घेण्याचा घेतला आहे.  आज आपण या लेखातून अशा जोड्या पाहणार आहोत ज्यांनी अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर मग घटस्फोट घेतले आणि त्यांचे घटस्फोट विविध कारणांनी गाजले देखील. 

ऋतिक रोशन आणि सुजेन खान :

बॉलिवूडमधील  सर्वात हँडसम अभिनेता अशी ओळख असलेल्या ऋतिक रोशनने देखील २०१४ साली त्याची पत्नी असलेल्या सुजेन खानपासून वेगळे होत त्यांचे १४ वर्षांचे लग्न मोडीत काढले होते. अर्जुन रामपाल आणि सुजेन खान यांच्या वाढत्या जवळिकीमुळे हा घटस्फोट(divorce) झाल्याचे सांगितले जाते. मात्र आजही मुलांसाठी या दोघांना एकत्र पाहिले जाते.  

आमिर खान आणि रीना दत्ता :

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरने पाहिले लग्न रीना दत्तासोबत केले होते. दोन मुलांच्या जन्मानंतर आणि लग्नाच्या १६ वर्षांनी २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतला. किरण राव यांच्यामुळे हा घटस्फोट (divorce) झाल्याचे सांगितले जाते. 

सैफ अली खान आणि अमृता सिंह :

सैफ अली खानने त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या अमृता सिंगसोबत १९९१ साली लग्न केले. मात्र दुर्दैवाने त्यांचे लग्न केवळ १३ वर्षच टिकले आणि २००४ साली ते वेगळे झाले. त्या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम खान अशी दोन मुलं आहेत.   

नुसरत जहां आणि निखिल जैन :

मनोरंजनविश्वातील सर्वात जास्त गाजलेल्या लग्न आणि घटस्फोटांपैकी एक असलेल्या या जोडीने देखील लग्नाच्या केवळ तीन वर्षातच घटस्फोट (divorce) घेतला. बंगाली अभिनेत्री आणि खासदार असणाऱ्या नुसरत जहां यांनी २०१९ साली उद्योगपती असलेल्या निखिल जैनसोबत लग्न केले. मात्र २०२१ साली त्यांनी लगेच घटस्फोटाचाच निर्णय घेतला. या काळात नुसरत या बंगाली अभिनेता असलेल्या यश दासगुप्ताला डेट करत असल्यामुळे हा घटस्फोट झाल्याचे सांगितले जाते. 

आमिर खान आणि किरण राव :

आमिर खानने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेत किरण रावसोबत लग्न २००८ साली लग्न केले. मात्र त्यांचे नाते देखील २०२१ मध्ये तुटले. लग्नाच्या १५ वर्षांनी त्यांनी घटस्फोट (divorce) घेतला. 

मलायका अरोरा आणि अरबाज खान :

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी १९९८ साली लग्न केले. बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारे कपल म्हणून यांच्याकडे पाहिले जायचे. मात्र लग्नाच्या १८ वर्षांनी त्यांनी २०१७ साली  घटस्फोट(divorce) घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

======

हे देखील वाचा – मनोरंजनविश्वातील असे कलाकार ज्यांनी त्यांच्या आयुष्यात केले दोनपेक्षा अधिक लग्न

======


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.