Home » निधनापूर्वी डॉ. आंबेडकरांनी बदलला होता धर्म, जाणून घ्या कारण

निधनापूर्वी डॉ. आंबेडकरांनी बदलला होता धर्म, जाणून घ्या कारण

by Team Gajawaja
0 comment
Babasaheb Ambedkar
Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Ambedkar) यांनी नागपुरातील दीक्षाभूमी येथे १४ ऑक्टोंबर १९५६ मध्ये आपल्या ३ लाख ६५ हजार अनुयायांसोबत बुद्ध धर्माचा स्विकार केला होता. यापूर्वी काही पुस्तक आणि लेखकातून त्यांनी वेळोवेळी सांगितले की, अपृश्यांना समानता मिळण्यासाठी बुद्धच धर्म स्विकारण्याचा एकमेव मार्ग का हे स्पष्ट केले होते. दरम्यान, काही काळानंतर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना बुद्ध धर्मात प्रवेश करु दिला. ही बाब नेहमीच वादात राहते की, अखेर आंबेडकरांनी हे पाऊल का उचलले?

डॉ. भीमराव आंबेडकरांनी १९५३ चे एक भाषण खुप आक्रमक होते. तेव्हा आंबेडकरांनी पहिल्यांदाच जबरदस्त भाषण करत तळागाळातील समाजातील जनतेला खुप काही विचार करण्यास भाग पाडले होते. त्यांचे हे भाषण जवळजवळ २० वर्षानंतर सत्यात उतरले गेले. या भाषणात समाजाची पीडा आणि भावना दडल्या होत्या. त्यांच्या या भाषणाने सर्व लोकांचे डोळे उघडले होते. त्यांनी त्या भाषणात म्हटले होते की, ताकद हवी असेल, सत्ता आणि समानता हवी असेल तर धर्म बदला.

आंबेडकरांच्या या भाषणाचा झाला विरोध
या भाषणाने आंबेडकरांबद्दल अधिक चर्चा होऊ लागली. त्यांचा विरोध ही सुरु झाला. काही नेतेमंडळी सुद्धा त्यांच्या विरोधात झाली. आंबेडकरांवर देशातील २० टक्क्यांहून अधिक लोकांना भडकवण्याचा आरोप लावला होता. त्यावर त्यांनी म्हटले की, जे शोषित आहेत, त्यांच्यासाठी धर्म हा नियतिचा विषय नव्हे तर निवडणूकीचा विषय मानला पाहिजे. ही बाब जेव्हा गांधीजींकडे पोहचली तेव्हा त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट म्हटले की,धर्म बदलण्याने कोणतेही समाधान होत नाही आणि असे करु ही नये.

Dr.Ambedkar
Dr.Ambedkar

हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही
मी हिंदू धर्मात जरुर जन्म घेतला आहे. पण त्या धर्माचा म्हणून मरणार नाही. १९३५ मध्येच आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्यासह हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली होती. मात्र औपचारित रुपात अन्य धर्म स्विकारला नव्हता. आंबेडकरांना हे समजले की, त्यांच्या धर्मांतराबद्दल नव्हे तर संपूर्ण समाजाबद्दल समजून घेण्यासाठी त्यांचा इतिहास समजला पाहिजे आणि काही लेख लिहून शोषित समाजाला जागृत आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

बुद्ध धर्म अधिक वैज्ञानिक आणि तर्कसंग
वर्ष १९४० मध्ये आपल्या अभ्यासाच्या आधारावर आंबेडकरांनी द अनटचेबल्स मध्ये लिहिले होते की, भारतात ज्यंना अस्पृश्य म्हटले जाते ते मूळ रुपात बौद्ध धर्माचे अनुयायी होते. ब्राम्हणांनी याच कारणास्तव त्यांचा नेहमीच राग केला. या कथेनंतर आंबेडकरांनी १९४४ मध्ये मद्रासमध्ये एक भाषणात म्हटले आणि सत्यात उतरवले की, बौद्ध धर्म हा अधिक वैज्ञानिक आणि तर्क आधारित धर्म आहे. तर स्वातंत्र्यानंतर संविधान सभेचे प्रमुख झाल्यानंतर बौद्ध धर्मासंबंधित चिन्ह सुद्धा आंबेडकरांनीच निवडले होते.(Dr. Ambedkar)

कोणत्या होत्या २२ प्रतिज्ञा
१४ ऑक्टोंबर १९५६ मध्ये नागपूर मधील दीक्षाभूमीत आंबेडकरांनी विधिवत बौद्ध धर्माचा स्विकार केला. याच दिवशी महाराष्ट्रातील नागपूर मध्ये आंबेडकरांनी सामूहिक धर्म परिवर्तनाचा एक कार्यक्रम सुद्धा आयोजित केला. तेथे आपल्या अनुयायांसोबत २२ शपथा दिल्या, ज्याचा सार होता की, बौद्ध धर्म स्विकारल्यानंतर कोणत्याही हिंदू देव-देवता आणि त्यांच्या पूजेवर विश्वास ठेवू नये. हिंदू धर्मातील कर्मकांड होणार नाहीत आणि ब्राम्हणाच्या कोणत्याही रुपाची पूजा केली जाणार नही. या व्यतिरिक्त समानता आणि नैतिकता ुद्धा आपलीशी करण्यासंबंधित शपथा होत्या.

हे देखील वाचा- भारताचे अर्थमंत्री ते पाकिस्तानचे पंतप्रधान, लियाकत अली खान यांच्या हत्येचे गुढ आजही कायम

धर्म परिवर्तन आणि त्यानंतर…
आंबेडकरांनी (Dr. Ambedkar) धर्म परिवर्तन केल्यानंतर खऱ्या रुपाने दलित बौद्ध आंदोलनाच्या नावाने इतिहास रचला. ज्याच्यानुसार आंबेडकरांच्या मार्गावर लाखो लोकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. दरम्यान, या धर्मांतरानंतर मुश्किलीने दोन महिन्यानंतर त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर हे आंदोलन धिम्या मार्गाने जात होते. २०११ च्या जनगणेनुसार देशातील जवळजवळ ८४ लाख बौद्ध आहेत, त्यापैकी ६० लाख महाराष्ट्रातील आणि हे महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येचा ६ टक्के होते.

बौद्ध पद्धतीने झाले आंबेडकरांवर अंतिमसंस्कार
आंबेडकर हे १९४८ पासून मधुमेह आजाराने ग्रस्त होते. ते जून ते ऑक्टोबर १९५४ पर्यंत खुपच आजारी होते. त्यांची प्रकृती अधिक बिघडली होती. आपली अखेरची पांडुलिपी बौद्ध आणि त्यांच्या धम्मला पूर्ण करण्यासाठी ३ दिवसानंतर म्हणजेच ६ डिसेंबर १९५६ ला त्यांचा मृत्यू दिल्लीतील त्यांच्या घरी झाला. ७ डिसेंबरला चौपाटीच्या समुद्र किनाऱ्यावर बौद्ध शैलीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले, ज्यामध्ये शेकडो हजारो समर्थकांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.