सायकल अगरबत्ती हा आज देशात एक लोकप्रिय ब्रँड बनला आहे, पण ज्या व्यक्तीने ती इथे आणण्यासाठी मेहनत घेतली ती म्हणजे एन रंगा राव. त्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर 7000 कोटींची कंपनी बनवली. एन. रंगाराव यांचे बालपण खूप गरिबीत गेले. त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार ही पाहिले. (Cycle agarbatti success story)
एन रंगा राव यांचा जन्म 1912 मध्ये झाला. ते एका सामान्य कुटुंबातील होते. त्यांचे वडील शिक्षक होते. पण ते रंगा राव 6 वर्षांचे असताना त्यांचे निधन झले. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती.मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. एन रंगा राव यांनी कधीच हार मानली नाही, रंगा राव यांनी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या शाळेबाहेर बिस्किटे विकण्यास सुरुवात केली. बिस्किटे विकून कमावलेल्या पैशातून तो त्याची फी भरायेच, त्याचसोबत उरलेले पैसे घर चालवण्यासाठी द्यायचे.
एन रंगा राव यांचा १९३० मध्ये विवाह झाला. यानंतर तो नोकरीच्या शोधात अरुवकांडू येथे गेले. तेथील एका कारखान्यात तो कारकून म्हणून काम करू लागले. पण त्यांना ही नोकरी आवडली नाही आणि 1948 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. यानंतर त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. एन रंगा राव यांनी व्यवसाय करण्यासाठी दागिने विकले. अवघ्या 4000 रुपयांपासून त्यांनी व्यवसाय सुरू केला. यानंतर त्यांनी आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही.
एन रंगा राव यांनी अगरबत्तीला सायकल असे नाव फार विचार करुन दिले होते. खरंतर ते व्यवसाय करू लागल्यावर सायकलवर अगरबत्ती विकायचे. त्यांना विश्वास होता की हे एक अतिशय सोपं नाव आहे आणि लोकांना ते सहजपणे समजू शकेल. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून अगरबत्ती बनवण्याचे काम करून घेतले. कंपनीच्या नावाने त्यांनी एनआर ग्रुपही सुरू केला. (Cycle agarbatti success story)
हेही वाचा- आनंद घडला आणि अमिताभ रातोरात स्टार झाले
1980 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर व्यवसायाची सूत्रे त्यांच्या मुलांकडे आली. आता ते यशस्वीपणे चालवत आहेत. सध्या कंपनीचा व्यवसाय 7 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आज त्यांचा व्यवसाय 65 देशांमध्ये पसरलेला आहे. अमिताभ बच्चन आणि सौरव गांगुली यांसारखे प्रसिद्ध लोक सायकल अगरबत्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.