आपण सगळ्यांनीच ‘नवरा माझा नवसाचा’ मुव्ही पाहिलाच असेल. यात बसमध्ये एक नेपाळी गुरखा चढतो. त्याचं नाव असतं बहादूर भाई… नंतर तो एक म्युझिकल Rap गातो. मी ठरवलंय माझ्या मनाशी खूप…नेपाळ्यांचा मी बदलणार रूप ! पण सध्या हेच नेपाळी गुरखा आपल्या कोकणाचं रूप बदलत आहेत. ते कसं जाणून घेऊ. (Nepali workers)
कामासाठी भारतात स्थलांतर करणारे नेपाळी आपण अनेक वर्षांपासून पाहत आहोत. तसे नेपाळी हे अर्धे भारतीयच कारण त्यांना इथे आधार कार्ड सुद्धा मिळतं. हे लोक वॉचमन, शेफ, ड्रायव्हर अशी अनेक काम करतात, हे आपल्याला माहितच आहे. बाळासाहेब ठाकरेंचा थापा तर फेमसच आहे. पण आपल्या कोकणात सध्या मासेमारी आणि आंबा उत्पादनाच्या व्यवसायात नेपाळी कामगारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यात तो गरजेचाही झाला आहे. पण ज्या देशाला समुद्रच नाही अशा नेपाळमधून हे कामगार कसे येतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का ? साधारण नोव्हेंबर पासून कोकणात येणारे हे नेपाळी आंब्याच्या हंगामातच का येतात? ते काय काम करतात ? तर ही गोष्ट हल्ली चालत आलेली नाही तर ती पूर्वापार आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल.(Top Stories)
१५५९ साली राजा द्रव्य शाह हा यांनी गोरखा राज्याची स्थापना करून नेपाळच एकीकरण केलं. त्यांनी विविध लहान राज्यांना एकत्र करून आधुनिक नेपाळची निर्मिती केली. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या, “गुरखा” आणि “गोरखाली” हे शब्द “नेपाळी” चे समानार्थी होते. आता गुरखा हे खरं तर नेपाळमधील सैनिक आहेत जे ब्रिटीश सैन्यात भरती झाले होते आणि आता जवळपास २०० वर्षांपासून ते इंडियन आर्मी, नेपाली आर्मी आणि ब्रिटीश आर्मीमध्ये कार्यरत आहेत. आता या नेपाळ्यांचा इतिहास जरी समृद्ध असला तरीही नेपाळ हा आशिया खंडातील इतर देशांपेक्षा सगळ्यात गरीब देश मानला जातो आणि म्हणूनच नेपाळमधील लोकं हे त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जगभर फिरत असतात. त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. या शेतीऐवजी ते इतर व्यवसाय करतात पण त्यातून त्यांचं उत्पन्न निघत नसल्याने पर्याय म्हणून ते दर आंब्याच्या हंगामात महाराष्ट्रातील कोकणात येतात.(Nepali workers)
विशेष म्हणजे फक्त आंब्याच्या सीजनमध्येच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ५० हजारापेक्षा जास्त नेपाळी लोकं येतात. 1950 च्या भारत नेपाळ शांतता आणि मैत्री करारा अंतर्गत भारत आणि नेपाळ मधील ऐतिहासिक गुरखा कनेक्शन आणि खुल्या सीमांमुळे ही चळवळ सुलभ झाली. या करारामुळे नेपाळी नागरिकांना भारतात मुक्तपणे राहण्याची आणि काम करण्याची मुभा दिली गेली. आता मुळातच नेपाळी लोकांना शेतीमध्ये इंटरेस्ट असल्याने आंबा व्यवसायात ते अधिक रमले असं म्हणता येईल. कोकणातील आंब्याचा हंगाम नोव्हेंबरच्या एण्डला किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला आंब्याच्या झाडाला मोहोर लागल्यापासून ते आंब्याच्या काढणी पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सुमारे पाच ते सहा महिने चालते आणि मे- जूनच्या सुमारास संपते. या कालावधीत रोपांची छाटणी, कीटकनाशकांची फवारणी, फळबागा सांभाळणे, आंब्याची काढणी, वर्गीकरण व पॅकेजिंग यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. हे काम तात्पुरत आणि हंगामी आहे. यामुळे स्थानिक मजुर याला कमी महत्व देतात उलट ते बाहेर राहून नोकरी करण्याला प्राधान्य देतात. यामुळे तिथे ऍक्टिव्ह मजुरांचं काम कमी आहे आणि म्हणूनच नेपाळी लोकांना इथे मोठ्या प्रमाणात काम मिळतं.(Nepali workers)
===================
हे देखील वाचा :Bishnu Shrestha : एक ट्रेन, ४० डाकू आणि एकटा गोर्खा सैनिक…
===================
आता नेपाळी लोकांनाच का प्राधान्य दिलं जातं तर नेपाळी कामगार हे त्यांच्या कठोर परिश्रम, आव्हानात्मक परिस्थितीत काम करण्याची क्षमता यासाठी ओळखले जातात. शिवाय ते त्याचा मोबदला सुद्धा कमी घेतात. तक्रारीशिवाय जास्त तास कामही करतात. शिवाय नेपाळी लोकं त्यांच्या नावाप्रमाणेच इतके बहादूर असतात की आंब्याचं झाड कितीही मोठं असलं आणि त्याच्या शेंड्यावर जरी आंबा असला तरी तो काढण्यासाठी न घाबरता अशा उंच ठिकाणी चढतात. या कारणामुळे आंबा व्यावसायिकांसाठी ते बेस्ट ऑप्शन आहेत. म्ह्णूनच या गुरख्यांच भारतात येण्यामागे आणि खासकरून इथल्या आंब्याशी आर्थिक, सामाजिक,आणि ऐतिहासिक connection आहे. या आंब्याचा हंगाम संपला की हे नेपाळी लोक पुन्हा एकदा नेपाळमध्ये जायला सुरुवात करतात. कारण साधारणतः जूनच्या आसपास नेपाळमध्ये सुद्धा पाऊस सुरु होतो. त्याआधी त्यांना त्यांच्या शेताची पेरणी करायची असते. म्हणजेच ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. थोडक्यात जो आंबा आपली भूक भागवतो तो अनेक अर्थाने नेपाळी लोकांचीही भूक भागवतो.(Top Stories)
एका अर्थी म्हणायचं झालं, तर नेपाळी लोकांशिवाय कोकणातली आंब्याची शेती आणि मासेमारी अशक्यच आहे. त्यामुळे कोकणातला जगप्रसिद्ध हापूस असो किंवा इतर कोणताही आंबा जगभरात पोहचवण्यात नेपाळी गुरख्यांचासुद्धा महत्वाचा वाटा आहे एवढं मात्र नक्की !