आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मसाल्यांचा समावेश असतो. आणि त्या मसाल्यांमध्ये लवंग हमखास असते. जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी लवंग चा वापर केला जातोच पण लवंग जेवणासोबतच चहाची चव सुद्धा वाढवते त्यामुळे अनेक जणांच्या घरात चहामध्ये ही लवंग घातली जाते. पूजेच्या वेळी ही लवंगाचा वापर केला जातो. पूजा करताना लवंगाच्या जोड्या अर्पण करणे शुभ मानले जाते. इतकंच नाही तर ही एक छोटीशी लवंग दिसायला जरी छोटीशी असली तरीही ती तुमचं नशीब उजळवू शकते. हो, ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या आयुष्यातील कोणतेही काम बिघडत असेल तर लवंगाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतात. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खर आहे.लवंग चा वापर करुन केलेले उपाय तुमची अडचणींतून मुक्ति तर करतीलच आणि त्याचबरोबर पैसे कमावण्याचे नवे मार्गही तुमच्यासाठी खुले होतील. आजच्या लेखात आपण जाणून घेऊया लवंगाच्या काही चमत्कारिक उपायांबद्दल.(Clove Benefits)
![Clove Benefits](https://kfacts.in/wp-content/uploads/2023/04/lavang.jpg)
– जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात होत असलेल्या कामात अडथळा येत असेल तर त्याने सकाळी पूजा करताना तुपाचा दिवा लावावा आणि त्यात 2 लवंगा टाकून आरती करावी. पण लक्षात ठेवा यासाठी फुलांच्या लवंगांचा वापर करा. यामुळे वातावरण शुद्ध होते आणि कोणत्याही कामात अडथळा येत नाही.
– जर तुम्ही एखाद्या कामात वारंवार अपयशी ठरत असाल आणि त्यात यश मिळवू इच्छित असाल तर त्यासाठी एक लिंबू घ्या आणि त्यावर 4 लवंगा रोवून ठेवा. त्यानंतर ‘ॐ श्री हनुमंते नम:’ या मंत्राचा २१ वेळा जप करा आणि मग कोणत्याही कामासाठी जाताना तो लिंबू सोबत ठेवा. हा उपाय केल्याने तुमची सर्व अडकलेली कामे होऊ लागतील.(Clove Benefits)
![Clove Benefits](https://kfacts.in/wp-content/uploads/2023/04/lavnag-2.jpg)
– हनुमान देवाला संकटमोचन म्हणतात आणि त्यांची पूजा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो, असे मानले जाते. जर तुमच्या आयुष्यात काही अडचण असेल किंवा तुम्हाला कसलाही त्रास होत असेल तर सात वेळा बजरंग बनचे पठण करा आणि हनुमान देवाला लाडूचाचा नैवद्य दाखवा यासोबतच पूजेच्या ठिकाणी पाच लवंगा आणि कापूर जाळून टाका. मग त्याच्या भस्माचा तिलक लावून घराबाहेर पडा.
– प्रत्येक व्यक्तीला पैसा मिळवायचा असतो पण अनेकदा खूप मेहनत करूनही त्याला अपयशाला सामोरे जावे लागते. यासाठी कच्च्या भाताच्या तेलाचा दिवा लावावा आणि मग त्यात फुलांच्या दोन लवंगा टाकून हनुमान देवाची आरती करावी. यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला धनलाभ होईल.
===================================
हे देखील वाचा : चुकूनही दुसऱ्यांच्या ‘या’ वस्तू वापरू नका; येऊ शकते आरोग्य आणि पैशाची समस्या
===================================
लक्षात ठेवा देवाचा आशिर्वाद सगळ्यांवर असतो मात्र प्रयत्न करण्यासाठी कोणताही पर्याय नाही त्यामुळे वरील सगळे उपाय करण्याबरोबरच तुमचे प्रामाणिक प्रयत्न सुद्धा तेवढेच गरजेचे आहेत त्यामुळे वरील उपाय आणि त्याला तुमच्या प्रयत्नांची जोड यामुळे तुमच्या अडचणी नक्कीच कमी होतील आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल.
(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. ही सर्व माहिती खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही.)