Home » Chanakya : चाणक्य नीतीनुसार ‘हे’ गुण असलेली स्त्री ठरते उत्तम जोडीदार

Chanakya : चाणक्य नीतीनुसार ‘हे’ गुण असलेली स्त्री ठरते उत्तम जोडीदार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chanakya
Share

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे लग्न. लग्न हे पुरुष असो किंवा स्त्री दोघांसाठीच खूप महत्वाचे असते. संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारे आणि पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात होते ती लग्नानंतर. आजच्या काळात लग्न जितकी सुंदर आणि स्वप्नवत बाब आहे, तितकीच धोकादायक आणि थोडीशी टेन्शन आणणारी गोष्ट ठरत आहे. अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज दोन्ही प्रकारच्या लग्नांसाठी मुलांना येणारे सर्वात जास्त टेन्शन म्हणजे योग्य किंवा चांगली मुलगी कशी निवडावी? (Chanakya)

आपण अनेक लोकांचे याबद्दल विचार करतो आपले मोठे लोकं अनेकदा बोलता बोलता लग्नासाठी मुलगी कशी असावी याबद्दल देखील बोलताना आपण ऐकतो. मात्र जेव्हा आपण स्वतः याबद्दल विचार करतो तेव्हा आपला डोक्यात, मनात खूप गोंधळ चालू असतो. आपल्याला समजत नाही नक्की मुलगी कशी असावी? कशी असू नये? याच प्रश्नाचे उत्तर भारतातील अतिशय महान अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ असणाऱ्या चाणक्य यांनी शेकडो वर्षांपूर्वीच लिहून ठेवले आहे. आचार्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र, राजकारण, मुत्सद्देगिरी याशिवाय व्यावहारिक जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे शब्द आणि धोरणे आजही माणसाच्या कठीण काळात खूप उपयुक्त ठरतात. आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. त्यांना त्यांच्या या खासियतीमुळे कौटिल्य देखील म्हटले जाऊ लागले होते. (Marathi News)

आचार्य चाणक्य यांचे विचार, धोरणे आजही समाजासाठीही योग्य दिशा देणारे ठरतात. चाणक्य यांनी सर्वच वयोगटातील लोकांना काही ना काही धडे दिले आहेत. ज्याचे पालन केल्याने मनुष्य आपले जीवन सुधारू शकतो. चाणक्याची धोरणे कठोर असली तरी जीवनातील सत्य त्यात दडलेली आहेत. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. (Todays Marathi News)

लग्नासाठी मुलगी कशी निवडायची, हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत सांगून ठेवले आहे. आचार्य चाणक्य यांचे विचार भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे मानले जातात. त्यांचे योगदान केवळ राजकीय क्षेत्रात नव्हतं, तर सामाजिक क्षेत्रातही होतं. माणसाने सामाजिक जीवनात कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे देखील त्यांनी सांगितले आहे. चाणक्य यांनी त्यांच्या नीती शास्त्रात, कोणत्या स्त्रीशी विवाह केल्याने पुरुष सुखी होतो, याची लक्षणे सांगितली आहेत. (Marathi Latest NEws)

* उपवर मुलीचे बोलणे एकदम मधुर असावे. प्रत्येक व्यक्तीने गोड बोललं पाहिजे, गोड बोलण्याने सगळी कामे होऊ शकतात आणि इतरांची मनही जिंकता येतात. गोड बोलणाऱ्या लोकांच्या घरात कायम लक्ष्मीचा वास असतो.

Chanakya

* जी स्त्री मनाच्या सौंदर्याला महत्त्व देते अशा स्त्रीशी विवाह करा. शारीरिक सौंदर्य निघून जाते, पण व्यक्तीचा स्वभाव कायम असतो. स्वभावाला महत्त्व देणारी आणि आंतरीक सौंदर्याला महत्त्व देणारी स्त्री उत्तम जोडीदार ठरते.

* जी मुलगी रुढी आणि परंपराचे पालन करते अशी मुलगी विवाहासाठी श्रेष्ठ असते. अशी पत्नी आपल्या पतीचे सौभाग्य वाढवते. घरात पुजाविधी करून देवी देवतांना प्रसन्न करुन घरात सुख समृद्धी आणते. (Marathi Trending News)

* ज्या मुलींना लोभ नसतो, ज्या मुली कायम समाधानी असतात त्या नवऱ्यासाठीच नव्हे तर कुटुंबासाठीही चांगल्या असतात. पूर्वीच्या स्त्रिया सुखी-समाधानाने वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असत.

* ज्या स्त्रीला कधी राग ये नाही, ती नेहमी शांत राहते, अशा स्त्रीशी विवाह करणे चांगले असते. राग हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागीट व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून शांत स्वभावाच्या स्त्रीशी विवाह करणे लाभदायक असते.

* घरातील ज्येष्ठांचा मान राखणारी आणि छोट्यांवर प्रेम करणारी स्त्री उत्तम पत्नी ठरते. (Social News)

* जी स्त्री धैर्यवान असते, ती स्त्री कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवनसाथीची साथ सोडत नाही. अशा स्त्रीशी विवाह केल्याने व्यक्तीचे नशीब फळफळते.

* धार्मिक वृत्ती असलेल्या स्त्रीशी विवाह केल्याने नशीब उजळते. धार्मिक व्यक्ती कधीच चुकीच्या मार्गाने जात नाही. धर्माच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. (Top Stories)

* ज्या मुलीचे कुटुंब एक सुदृढ समाज निर्माणात योगदान देते, ज्या मुलीचे घराणे, तिच्या आई-वडिलांच्या जीवनशैलीचा प्रभाव यावरून तुम्हाला मुलीच्या विचारांची झलक दिसू शकते. ज्या कुटुंबात प्रेम, विश्वास आणि परस्पर आदर असतो, तिथे त्या मुलीचे वर्तन आणि तिच्या निर्णयक्षमता यावर त्याचा परिणाम होतो.

* एका स्त्रीची निर्णय घेण्याची क्षमता आणि तिच्या बुद्धिमत्तेवरच एक सुदृढ कुटुंब उभे राहते. शिक्षण हे केवळ तिला विचार करण्याचे सामर्थ्य देत नाही, तर जीवनातील अवघड प्रसंगांमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता देते. शिक्षित स्त्री तिच्या विचारांमध्ये स्वावलंबी आणि आत्मविश्वासी असते.

Chanakya

*मुलगी कशी बोलते, तिचे वागणे कसे आहे, यावरून तुम्ही तिच्या स्वभावाचा अंदाज लावू शकता. चाणक्यांच्या मते, चांगले आचार-व्यवहार आणि सभ्यतेने वागणारी स्त्री केवळ एक चांगली पत्नीच नव्हे, तर एक आदर्श माता आणि कुटुंबासाठी आधारस्तंभ ठरते. (Marathi Top Headline)

============

हे ही वाचा : 

Health : त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे जास्वंदीचे फुल

Water : दिवसभरात किती पाणी प्यावे?, जास्त पाणी पिण्याचे तोटे

=============

* ज्या मुलीकडे धैर्य आणि सहनशक्ती असते, ती कठीण प्रसंगांमध्ये ताठ मानेने उभी राहते आणि कुटुंबाला साथ देते. धैर्यवान स्त्री संकटातही आशावादी राहून कुटुंबाच्या सुखासाठी आपले सर्वकाही देते.

* योग्य जीवनसाथीची निवड करताना त्या स्त्रीचे संस्कार, बुद्धिमत्ता, आचार-व्यवहार, धैर्य आणि आरोग्य हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत. लग्न हे फक्त दोन व्यक्तींमध्ये नाते नाही, तर दोन कुटुंबांमधील एक बंधन असते. (Todays Marathi Headline )

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.