Home » ‘पुनःश्च हरिओम म्हणून पुन्हा लॉकडाऊन; सरकार भांबावलंय’

‘पुनःश्च हरिओम म्हणून पुन्हा लॉकडाऊन; सरकार भांबावलंय’

by Correspondent
0 comment
Share

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सातत्यानं सुरु असतानाच महाराष्ट्रातही याबाबतचं चित्र वेगळं नाही. कोरोना रुग्णांचा आकडा राज्यात अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच आता राज्य शासन यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत नाराजीचा सूर आळवला. काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊन बऱ्याच काळासाठी लागू केल्यानंतर देशासह राज्यात अनलॉकची सुरुवात करण्यात आली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पुनःश्च हरिओमची ग्वाही देत एक नवी सुरुवात करण्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्या अनुशंगानं पावलंही उचलली गेली. पण, आता मात्र लॉकडाऊनमध्ये केंद्राकडून शिथिलता दिली जात असताना राज्यात मात्र काही निर्बंध उठवण्यातच आलेले नाहीत.

राज्य शासनाच्या याच भूमिकेवर दरेकर यांनी टीका करत सरकार भांबावल्याचं वक्तव्य केलं. ‘हे सरकार भांबावलेलं आहे. स्वत: पुनःश्च हरिओम म्हणतात आणि पुन्हा लॉकडाऊन लावतात. व्यापाऱ्यांनी मागणी केली म्हणून लॉकडाऊन उठवलं असंही म्हणतात’, असं चित्रं शब्दांत मांडत त्यांनी उद्योग व्यवस्था नीट चालली नाही तर अराजकता पसरेल या म्हणण्यावर जोर दिला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.