संविधानाचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. देशभरातील लोक बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. डॉ. भीमराव आंबेडकर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन बरेच संघर्षमय होते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले. दुर्बल आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी बाबासाहेब आयुष्यभर लढले. ते सामाजिक पुनर्जागरणाचे प्रणेते आणि समतावादी समाजाचे निर्माते होते.
बाबासाहेबांना समाजातील दुर्बल, कष्टकरी, महिला इत्यादींना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करायचे होते. म्हणूनच त्यांची जयंती भारतात समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून साजरी केली जाते. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनाशी निगडित रंजक गोष्टी.
भीमराव आंबेडकर यांचा जीवन परिचय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील होते. आंबेडकरांच्या वडिलांचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील होते.
आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ, तर आईचे नाव भीमाबाई होते. डॉ.आंबेडकर हे महार जातीचे होते, अशा परिस्थितीत त्यांना लहानपणापासूनच भेदभावाला सामोरे जावे लागले.
बाबासाहेबांचे शिक्षण
बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासात चांगले होते. मात्र, त्या काळात अस्पृश्यतेसारख्या समस्यांचा प्रादुर्भाव असल्याने, त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणात खूप अडचणी आल्या. मात्र जातीच्या साखळ्या तोडत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
मुंबईतील एल्फिन्स्टन रोडवर असलेल्या सरकारी शाळेत ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. पुढे १९१३ मध्ये आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. १९१६ साली बाबासाहेबांना त्यांच्या संशोधनासाठी सन्मानित करण्यात आले ही मोठी कामगिरी होती.
बाबासाहेबांना मिळाली डॉक्टरची पदवी
लंडनमध्ये शिकत असताना त्यांची शिष्यवृत्ती संपल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) मायदेशी परतले आणि मुंबईच्या सिडनाम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले. १९२३ मध्ये, त्यांनी एक शोध पूर्ण केला, ज्यासाठी त्यांना लंडन विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान केली. पुढे १९२७ मध्ये आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून पीएचडीही पूर्ण केली.
बाबासाहेबांचे करिअर
बाबासाहेबांना (Babasaheb Ambedkar) त्यांच्या आयुष्यात जात आणि विषमतेचा खूप सामना करावा लागला. त्यामुळेच दलित समाजाच्या समान हक्कासाठी ते कार्यरत राहिले. आंबेडकरांनी ब्रिटीश सरकारकडे स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती, ती मंजूरही झाली होती. पण जेव्हा गांधीजींनी निषेधार्थ उपोषण केले, तेव्हा आंबेडकरांनी आपली मागणी मागे घेतली.
बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व
आंबेडकरांच्या राजकीय जीवनाविषयी सांगायचे झाले, तर त्यांनी लेबर पार्टीची स्थापना केली होती. ते घटना समितीचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतर त्यांची कायदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली. नंतर त्यांनी बॉम्बे नॉर्थ मतदारसंघातून देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
बाबासाहेब (Babasaheb Ambedkar) दोन वेळा राज्यसभेतून खासदार म्हणून निवडून आले. त्याचवेळी ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.भीमराव आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर, १९९० मध्ये, बाबासाहेबांना भारताचा सर्वोच्च सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला.