मे – जून महिना सुरु झाला की, वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. पंढरपूरची वारी म्हणजे सर्वच महाराष्ट्रासाठी नव्हे नव्हे संपूर्ण जगासाठी एक अद्भुत सोहळाच असतो. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं पंढरपूरच्या दिशेने आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पायी निघतात. यालाच वारी असे म्हटले जाते. वारकरी संप्रदायासाठी वारी सर्वात महत्वाची समजली जाते. वारकरी लोकं वर्षानुवर्षे वारी करतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. सुरुवातीला महाराष्ट्रापुरतीच ओळख असलेल्या या वारीला आता जागतिक ओळख मिळाली आहे. (Wari)
या वारीमध्ये सर्व जाती, धर्माचे, पंथाचे लोकं एकत्र येतात आणि विठुरायाचा गजर करतात मार्गक्रमण करतात. वारीचा अनुभव काही औरच असतो. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता वारकरी विठ्ठलाच्या भेटीच्या आशेने चालत असतात. एकत्र राहणे, स्वयंपाक करणे, जेवणे, चालणे, झोपणे, सुख दुःखांची देवाण घेवाण करणे, विठ्ठलाचे नाम घेणे आदी सर्वच गोष्टी हे सर्व वारकरी आनंदाने एकत्र करतात. वारीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. याच वारीचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘रिंगण सोहळा’. (Marathi News)
वारकरी आणि वारी यांच्यातील प्रमुख सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. रिंगण ही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारी मधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. वारीच्या प्रमुख मार्गातील काही विशिष्ट मुक्कामाच्या ठिकाणी हे रिंगण होते. रिंगण करण्यासाठी मोकळे माळरान किंवा मोठे मैदान आवश्यक असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात त्यांचे अश्व अर्थात घोडे सोबत असतात. या पालखीतील रिंगण पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. या रिंगण सोहळ्यात असणाऱ्या अश्वाचे महत्व विशेष असते असे म्हटले जाते की, या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी असलेल्या अश्वावर स्वःत ज्ञानेश्वर महाराज विराजमान असतात. म्हणून या घोड्याला नमस्कार करण्यासाठी मोठी गर्दी असते. (Latest Marathi News)
हे रिंगण करत असताना विविध दिंडीमधून वारीला येणारे वारकरी आपापल्या ठरवून दिलेल्या जागी वर्तुळात उभे राहत असतात. या वर्तुळाच्या मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी जागा मोकळी सोडली जाते. सहभागी सर्व वारकरी वर्तुळात उभे राहून गजर सुरू करतात. यावेळी विठ्ठल नामाचा गरज करत टाळ, मृदुंग वाद्ये वाजविली जातात. हा गजर सुरू असताना अश्व रिंगणाच्या मधून धावत असतो आणि त्याच्या मागे वारकरी धावतात. हे रिंगण पूर्ण झाल्यानंतर वारकरी झिम्मा, फुगड्या, मनोरे नाचवत रिंगणाच्या आनंद घेत असतात. (Todays Marathi Headline)
रिंगणाचे आहेत २ प्रकार
रिंगण सोहळे हे २ प्रकारचे असतात. एक गोल रिंगण तर दुसरे उभे रिंगण. गोल रिंगणाप्रमाणेच उभे रिंगण हा एक रिंगणाचा प्रकार असून यात गोल रिंगणाप्रमानेच सर्व विधी आणि खेळ खेळले जातात. फरक फक्त इतकाच की गोल रिंगण हे नावाप्रमाणे वर्तुळाकार पद्धतीने असतो. यात दिंड्या आणि वारकरी वर्तुळाकार उभे रहाता, तर उभ्या रिंगणात दिंड्या पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात. या मधून अश्व दौडतो. (Top Marathi Headline)
बकरी रिंगण
वारी दरम्यान, बकरी किंवा मेंढ्यांचे रिंगण देखील होते. संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यात हे रिंगण बघायला मिळते. यात वारकरी शेतकरी आपल्या मेंढ्या आणि बकऱ्या घेऊन वारीत सहभागी होत पालखीला प्रदक्षिणा घालतात. याला बकरी रिंगण म्हणतात. बकरी रिंगण पिंपळी येथे होते. त्यानंतर इंदापूर येथे दुसरे रिंगण होते. (Social News)
रिंगण सोहळा कुठे संपन्न होतो?
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
– चांदोबाचा लिंब
– बाजीराव विहीर
– वाखरी
– माळशिरस
– ठाकुर बुवा समाधी
– भंडीशेगाव
===========
हे देखील वाचा : Gupt Navratri : गुप्त नवरात्रीचे रहस्य !
Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !
===========
संत तुकाराम महाराज पालखी
– बेलवंडी
– इंदापूर
– अकलूज
– बाजीराव विहीर
– वाखरी