Home » AndhraPradesh Temple : नंदीच्या मूर्तीमुळे कलियुगाचा अंत?

AndhraPradesh Temple : नंदीच्या मूर्तीमुळे कलियुगाचा अंत?

by Team Gajawaja
0 comment
AndhraPradesh Temple
Share

जगात सर्वात जास्त हिंदू लोकं ही भारतात राहतात आणि भारतामध्येच सर्वात जास्त हिंदू धर्माची मंदिरं देखील आहेत. भारतात अशीही काही प्राचीन मंदिरं आहेत ती प्रत्येकाने एकदा तरी जरूर पाहावी कारण प्रत्येक मंदिराचा इतिहास त्याचं महत्त्व,वैशिष्ट्य हे खूप खास असतं आणि ते प्रत्येकाला तितकचं भावणारं असतं. आपल्या भारतात देखील अशी काही रहस्यमय मंदिरं आहेत. परंतु त्या रहस्यांमागचं नेमकं कारण काय ? हे अजूनही समोर आलेलं नाही. मुळात भगवान शंकराची अनेक मंदिरं आपल्या भारतात आहेत, परंतु प्रत्येकवेळी शिवलिंगाबद्दल किंवा त्या मंदिरांच्या इतिहासाबद्दलच बोललं जातं पण त्यांचं वाहन असलेल्या नंदीबद्दल अनेकदा बोललं जात नाही.(AndhraPradesh Temple)

आपल्या भारत देशात प्राचीन मंदिरांची काही कमतरता नाहीये आणि या प्रत्येक मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व देखील आहे हे तर आपल्याला माहितच आहे. जर आपण दक्षिण भारतातील मंदिरं बघितली तर त्या मंदिरांची रचना, भव्यता पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. दक्षिण भारतात असचं एक मंदिर आहे ज्याला एक मोठा इतिहास आणि महत्त्व आहेच आणि त्यासोबतच मंदिराचं एक वैशिष्ट्य देखील आहे. पण ही गोष्ट ऐकून तुमचं डोकं चक्रावणार हे नक्की ! आपल्या भारतात भगवान शंकराची अनेक मंदिरं आहेत, त्यातील एक मंदिरं म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये असलेलं ‘श्री यागंती उमा महेश्वर’ नावाचं एक अनोखं मंदिर इथे आहे. प्रत्येक माणसाची श्रद्धा विशेषतः शिवलिंगामध्ये आणि मूर्तीमध्ये असते. पण नंदीबद्दल अनेक जणांना फार माहिती नसते. नंदीला तसं नंदीकेश्वर किंवा नंदीदेवही म्हटलं जात. नंदी हे शंकराचं केवळ वाहन नाही तर त्यांचा सर्वात मोठा भक्त असल्याचंही म्हटलं जात. शंकराचे अनेक गण आहेत त्यामध्ये नंदी सर्वोच्च गण मानला जातो.

पण श्री यागंती उमा महेश्वर मंदिरातला नंदी हा पूर्णपणे वेगळा आहे. हे मंदिर 15व्या शतकात विजयनगर साम्राज्यातील राजा हरिहर बुक्क याने बांधल्याचं म्हंटलं जातं. आता मंदिर म्हंटलं की त्याला प्रथा आणि परंपरांचा इतिहास असत. अशीच परंपरा ह्या मंदिराला देखील आहे,कारण हे मंदिर वैष्णव परंपरेनुसार बांधलं गेलं आहे. प्राचीन काळातील पल्लव, चोळ, चालुक्य आणि विजयनगर संस्कृतीचं प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिलं
जात. असं म्हंटलं जातं की महान ऋषी अगस्त्य यांना याच जागेवर भगवान व्यंकटेश्वराचं मंदिर बांधायचं होतं. मात्र, मूर्तीच्या पायाचा काही भाग तुटल्याने मूर्ती बसवता आली नाही. आणि त्यावर ऋषी नाराज होऊन त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि जेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि तेव्हा ते म्हणाले की “हे स्थान शिवाला अधिक अनुकूल आहे कारण ते कैलासासारख आहे”.(AndhraPradesh Temple)

त्यानंतर अगस्त्यांनी भगवान शिवाला विनंती केली की भक्तांना पार्वती देवी ही भगवान उमा महेश्वराच्या रूपात एकाच दगडात द्या”, तपश्चर्येमुळे प्रसन्न झालेल्या भगवान शंकराने ते मान्य देखील केलं. आता मंदिर म्हंटलं की त्याला पौराणिक कथा ह्या असणारच. आणि ह्या कथांमध्ये सुद्धा काही गंमती आणि रहस्य ही दडलेली असतात. तशीच अजून एक दंतकथा म्हणजे हिंदू धर्मातील दोन महत्त्वाच्या ग्रह देवता राहू आणि केतू या दोन्ही देवतांनी या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली आणि त्यांना अपार शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त केलं.(Marathi News)

जरी आपण या कथांना केवळ लोककथा म्हणून दुर्लक्षित केल तरी या प्रत्येक मंदिरामागचं विज्ञान तुम्हाला नक्कीच विश्वास देईल की या मंदिराच्या निर्मितीमध्ये आणखी बरच काही आहे असं म्हंटलं जातं. आता या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे “पुष्करिणी”, पुष्करिणी म्हणजे मंदिराच्या आवारात पाण्याचा एक छोटा तलाव आहे. डोंगराच्या पायथ्यापासून वाहत नंदीच्या मुखातून या “पुष्करिणीत” पाणी येत. यावरून या मंदिराच्या वास्तुशिल्पांच्या दृष्टीनं प्राचीन स्थापत्यकलेच कौशल्य दिसून येतं. पण इथली सर्वात रहस्यमयी गोष्ट म्हणजे मंदिरातील नंदीच्या मूर्तीचा आकार सतत वाढण… होय ! दर 20 वर्षांनी सुमारे एक इंच असा मंदिरासमोरील नंदीचा आकार सतत वाढत आहे. सुरुवातीला ही मूर्ती सध्याच्या आकारापेक्षा खूपच लहान होती असं तेथील स्थानिकांचं म्हणणं आहे. तसंच नंदीच्या वाढत चाललेल्या आकारामुळे मंदिरातील काही खांबही हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता या मूर्तीने मात्र भव्य रुप धारण केलं आहे.(AndhraPradesh Temple)

================

हे देखील वाचा : Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?

================

असंही सांगितलं जातं की या मंदिराच्या परिसरात आपल्याला कधीच कावळे दिसणार नाहीत. इथल्या लोकांनी देखील इथे कधीच कावळे पाहिले नसल्याचं सांगितल आहे. आता यामागे देखील एक कथा असल्याचं म्हंटलं जात, असं म्हणतात अगस्त्य ऋषी तपश्चर्येला बसलेले असताना वारंवार कावळे येऊन त्यांना त्रास द्यायचे त्यामुळे अनेकदा अगस्त्य ऋषींच्या साधनेत अडथळा यायचा त्यामुळे शेवटी त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी कावळ्यांना या परिसरात कधीही न फिरकण्याचा शाप दिला. कारण मुळात कावळे हे शनिदेवाचं वाहन आहे आणि या ठिकाणी शनिदेव हे वास्तव्य करत नाहीत असं म्हंटलं जातं.(AndhraPradesh Temple)

हिंदू संत पोतुलुरी वीरब्रह्मेंद्र स्वामी यांच्या भविष्यसूचक ग्रंथात एक गोष्ट नमूद करण्यात आली आहे. त्यांनी असं भाकीत केलं आहे की, भगवान शंकराचं वाहन असलेला नंदी हा एक दिवस जागा होईल आणि ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी मोठा प्रलय होईल आणि कलियुगाचा अंत होईल. तसंच विष्णूचा शेवटचा अवतार असलेल्या कल्किचं अनुसरण करण्यासाठी लाखो घोडे यांगतीच्या गुहांमधून येतील. त्यामुळे हा तोच नंदी आहे, असं इथले ग्रामस्थ सांगतात. आता यात कितपत तथ्य आहे हे तर अद्याप समोर आलेलं नाही. ह्या मंदिरातील नंदी जागा होऊन खरचं ह्या युगाचा अंत होईल का ?


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.