Home » Chanakyaniti : आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टींचे पालन करून व्हा श्रीमंत

Chanakyaniti : आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टींचे पालन करून व्हा श्रीमंत

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chanakyaniti | Latest Marathi Headlines
Share

आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे, श्रीमंत व्हायचे, पैसा कमवायचा आहे. जगात असणाराने सर्व एशोआराम उपभोगायचे आहेत. यासाठी सर्वात आवश्यक आहे पैसा कमावणे. आता सगळ्यांनाच माहित आहे की, पैसे कमवण्यासाठी आवश्यक असते ती मेहनत आणि प्रयत्न. कठीण परिश्रम आणि अविरत प्रयत्न केल्यानंतर यश मिळणे अपेक्षित असते. मात्र सगळ्यांनाच मेहनत करूनही यश मिळेल याची शाश्वती नसते. कठोर मेहनत घेऊनही जर तुम्हाला यश मिळत नसेल तर त्या मेहनतीला अजून काही गोष्टींची जोड आवश्यक असते. (Chanakyaniti)

आचार्य चाणक्य यांनी माणसाला श्रीमंत व्हायचे असेल तर त्याने काय केले पाहिजे याबद्दल लिहून ठेवले आहे. सोबतच त्यांनी सांगितले आहे की, जर माणसाने काही छोट्या छोट्या सवयी अंगिकारला तर त्याला यश आणि पैसा कमावणे सोपे होते. आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, रणनीतिकार होते. आचार्य चाणक्यांनी मनुष्याला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या लहान, मोठ्या सर्वच समस्यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. मानवाला अनेक मुद्द्यांवर आचार्य चाणक्य यांनी सल्ला दिला आहे. (Marathi News)

शेकडो वर्षांपूर्वी आचार्य चाणक्य यांनी दिलेला सल्ला आजही माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र नावाच्या ग्रंथात जीवनाच्या अनेक पैलूंवर धोरणे तयार केली आहेत, जी जीवनात अंमलात आणल्यास खूप चांगले परिणाम मिळू शकतात. मनुष्याला जर जीवनात आर्थिक दृष्ट्या प्रगल्भ आणि यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला पैशांची कमी कधीच भासणार नाही. तुमच्यावर नेहमी लक्ष्मीची कृपा राहील. (Todays Marathi NEws)

Chanakyaniti

सतत खाण्याची सवय
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, खादाड स्वभावाचा माणूस फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि नेहमी खाण्याची त्याची ही सवय त्याला संपत्ती जमा करू देत नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे ही सवय असेल तर ती आजपासूनच बदलण्यासाठी प्रयत्न करा.

दिवसाचा शेवट सकारात्मकतेने करा
रात्री झोपताना कधीही नकारात्मक विचार करू नका. जेव्हा तुम्ही रात्री काहीतरी नकारात्मक विचार करता तेव्हा गोष्टी आणखी नकारात्मक होऊ लागतात. म्हणून दिवसाचा शेवट नेहमी आनंदी ठेवा. झोपण्यापूर्वी काहीतरी सकारात्मक विचार करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याबद्दल कृतज्ञ रहा. (Marathi Top NEws)

बचत न करणे
चाणक्यनीतीनुसार, जर माणसाला बचतीची सवय नसेल तर तो गरीब राहतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने आपल्या भविष्यासाठी आपल्या कमाईचा काही भाग नेहमीच वाचवला पाहिजे. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैसे कसे वाचवायचे ते शिकले पाहिजे. आचार्य चाणक्य म्हणतात की, पैसा कुठे खर्च करायचा आणि कुठे साठवायचा हे माहीत असेल तर माणूस श्रीमंत होऊ शकतो. (Trending Marathi News)

पैशाचा दुरुपयोग
आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, माणसाने कधीही विचार न करता पैसे खर्च करू नये. पैसे वाया घालवण्याची सवय माणसाला गरीब बनवू शकते. जर एखादी व्यक्ती विनाकारण पैसे खर्च करत राहिली तर कमाई करूनही त्याचा खिसा नेहमीच रिकामा राहील.

Chanakyaniti

विनाकारण पैसे उधार घेण्याची सवय
चाणक्यनीतीनुसार, कधीही विनाकारण कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नये. एखाद्या व्यक्तीला पैसे उधार घेण्याची सवय त्याला केवळ गरीब बनवत नाही तर त्याच्यावर कर्जाचा भारही टाकते. असे लोक कधीही संपत्ती जमा करू शकत नाहीत. (Marathi Latest News)

वादात अडकू नका
चाणक्याने आपल्या नीतिशास्त्रात लिहिले आहे की, श्रीमंत होण्यासाठी माणसाने स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालावे. त्याने कोणाशीही वाद घालू नये आणि कोणाशीही संबंध ठेवू नये.नको त्या गोष्टीमध्ये जास्त गुंताल तर तुम्हाला त्याचा मोठा घाटा होईल.

पैशाचा मोह टाळा
चाणक्य यांनी आपल्या धोरणात लिहिले आहे की, पैशाच्या हव्यासापोटी माणूस अनेकदा चुकीच्या मार्गावर जातो. एकदा का तुम्ही पैशाच्या प्रेमात अडकलात की तुम्ही तुमच्या नात्यांसह सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागता. त्यामुळे पैशाचा मोह टाळा कारण पैशाच्या मोहामुळे व्यक्तीमध्ये अहंकार वाढू लागतो. (Top Marathi HEadline)

आपल्या गोष्टी गुपीत ठेवणे
चाणक्य यांनी आपल्या निती शास्त्रात लिहिले आहे, की जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही तुमची कमजोरी कधीही कुणाला सांगू नका. तुम्ही चुकून तुमची गुपिते, कमजोरी कोणाला सांगितली तर वेळ आल्यावर ते त्याचा फायदा घेऊ शकतात.(Top Stories)

===========

हे देखील वाचा : Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !

Jagannath Rathyatra : कधी आहे जग्गनाथ रथयात्रा? जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

===========

दिवस कसा होता याचा विचार करा
आचार्य चाणक्य त्यांच्या धोरणात सांगतात की जो व्यक्ती आपल्या कर्माचा हिशोब ठेवतो तो आयुष्यात कधीही अपयशी ठरू शकत नाही. म्हणून तुम्ही दिवसभरात काय केले याची दररोजची नोंद तुमच्याकडे असली पाहिजे. रात्री झोपायला जाताना, तुमचा दिवस कसा गेला याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा. तुम्ही दिवसभरात ज्या चुका केल्या त्यातून तुम्ही काय शिकलात आणि दिवस चांगला करण्यासाठी तुम्ही काय करू शकला असता? याचा विचार करा आणि नवीन दिवशी होणाऱ्या चुका टाळा.(Social News)

ज्ञान वाढवा
झोपण्यापूर्वी पुस्तकं वाचा. तुमच्या ज्ञानात भर घालणारी गोष्ट म्हणजे पुस्तक. आचार्य चाणक्य सांगतात की ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे ज्ञान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.