१९७७, बिहारच्या कामेश्वर सिंह या बड्या जमीनदाराचा १६ वर्षांचा मुलगा कन्हैया सिंह मॅट्रिकची परीक्षा देऊन शाळेतून घरी परतताना गायब झाला. कामेश्वर सिंहला ५ मुली होत्या आणि हा एकुलता एक मुलगा तो घरी न परतल्यामुळे कुटुंबात एकच गोंधळ उडाला. जमीनदाराचा एकुलता एक मुलगा गायब होणं ही काही साधी गोष्ट नव्हती. कामेश्वर सिंह हा गावातला प्रभावशाली आणि श्रीमंत जमीनदार त्यांच्याकडे 60 एकरांपेक्षा जास्त सुपीक जमीन होती आणि जवळपास चार दशकं तो गावाचा बिनविरोध सरपंच होता. त्यामुळे गावातही सगळीकडे हीच चर्चा होऊ लागली. असेच काही वर्ष गेली तो सापडला नाही, निराश कामेश्वर सिंहने तांत्रिक बाबाची मदत घेतली. त्याने त्याला असं काही सांगितलं की कामेश्वर सिंह त्याचा मुलाची आणखींच वाट पाहू लागला. आणि अचानक एक दिवस त्याचा मुलगा शेजारच्या गावात भीक मागून पैसे गोळा करताना सापडला. कामेश्वर खुश झाला आणि त्याला तो घरी घेऊन आला. आणि मग तब्बल ४१ वर्षांनंतर जो खुलासा झाला तो खूप भयंकर होता. ४१ वर्ष ज्याला मुलगा म्हणून संभाळलं तो त्याचा मुलगाच नव्हता? कामेश्वरने त्याचं लग्न लावून, दिलं त्याला मुलं झाली आणि त्यानंतर हे सत्य उघडं झालं. पण हे एवढंच नाही आहे, याही पेक्षा गूढ काहीतरी या स्टोरीत आहे. ही संपूर्ण स्टोरी जाणून घेऊ. (Bihar)
तर 1977 साली कन्हैया सिंह मॅट्रिकच्या नालंदा जिल्ह्यातील मुरगावा गावातून परीक्षेवरून परतताना गायब झाला, म्हणजे तो खरी परतलाच नाही तेव्हा कामेश्वर सिंह यांनी त्याचा बराच शोध घेतला. त्यांनी पोलिस पोलिसांत हरवल्याची तक्रारही दाखल केली. पण बरीच वर्ष कन्हैयाचा काहीच पत्ता लागला नाही. हताशलेल्या कामेश्वर सिंहला कुठलाच मार्ग दिसत नव्हता म्हणून मग त्याने अंधश्रद्धेचा मार्ग निवडला, तो एका तांत्रिक बाबाकडे गेला. तो तांत्रिक कामेश्वरला म्हणाला की, तुझा मुलगा जीवंत आहे आणि लवकरच एक दिवस तो तुझ्याजवळ परत येईल. तेव्हापासून कामेश्वर मुलाच्या परत येण्याची वाट पाहू लागला. दिवस आठवड्यांत, आठवडे महिन्यांत आणि महिने वर्षांत बदलत गेले. पण कन्हैया परतला नाही.(Top Stories)
आणि चार वर्षांनी एक दिवस अचानक सप्टेंबर 1981 मध्ये मुरगावापासून फक्त 15 किमी अंतरावर असलेल्या नालंदा जिल्ह्यातल्या समस्ती नावाच्या छोट्या गावात एक विचित्र घटना घडली. साधारण 20-22 वर्षांचा एक तरुण मुलगा गाणं गाऊन भिक मागत होता. जेव्हा लोकांनी त्याला त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने त्यांना सांगितलं की, मुरगावातल्या एका मोठ्या जमीनदाराचा तो मुलगा आहे. आता एक भिकारी स्वत:ला जमीनदाराचा मुलगा बोलत होता म्हणून आणि कन्हैया गायब झाल्याची गोष्ट तिथे खूप प्रसिद्ध होती म्हणून. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.(Bihar)
मुलाच्या परत येण्याच्या आशेवर जगणाऱ्या कामेश्वर सिंहपर्यंत ही बातमी पोहचली. मुलाची वाट पाहताना कामेश्वरची नजर अंधुक झाली होती. पण तेव्हाच ते लगेच त्याला घरी आणण्यासाठी गेले होते. ते त्या तरुणाला नीट पाहू शकत नव्हते. पण त्यांच्यासोबत गेलेल्या शेजाऱ्यांनी त्या तरुणाला पाहून खात्री दिली आणि त्यांनी सांगितलं की हाच कन्हैया आहे. कामेश्वरचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो आपल्या मुलाला घेऊन मुरगावात आपल्या घरी परतला. घरी त्याची बायको म्हणजे कन्हैयाची आई नव्हती. जेव्हा काही दिवसांनी घरी परतली तेव्हा तिने त्या तरुणाला पाहिलं आणि एका क्षणात सांगितलं, “हा माझा कन्हैया नाही!”माझ्या मुलाच्या डोक्यावर एक खूण होती, या तरुणाच्या डोक्यावर ती नाही.” कन्हैयाची आई घरी आलेल्या कन्हैयाला आपला मुलगा मानायला तयार नव्हती. पण गावातले काही लोकं आणि कामेश्वर सिंह हाच आपला मुलगा कन्हैया आहे हे समजवून सांगत होते. कन्हैयाच्या शाळेतल्या शिक्षकाला बोलावलं, पण हा तरुण त्यांना ओळखू शकला नाही. सगळे पुरावे त्याच्या विरोधात होते. पण कामेश्वर सिंह ऐकायला तयारच नव्हते.(Top Stories)
कन्हैयाच्या आईने राम सखी देवींनी हार मानली नाही. त्यांनी त्या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली – फसवणूक आणि बनावटपणाचा आरोप त्याच्यावर केला. पोलिसांनी त्याला पकडलं, पण अवघ्या एका महिन्यात तो जामिनावर बाहेर आला. आणि मग काय, तो पुन्हा कामेश्वर सिंहांच्या हवेलीत राहायला आला! एवढंच काय कामेश्वर सिंह ने त्याचं थाटात लग्न लावून दिलं. त्याला मुलं झाली, दोन मुलं, तीन मुली. तो कन्हैया ‘जी’ बनला. गावात त्याला मान मिळू लागला. त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, डिग्री मिळवली. तो कन्हैयाची ओळख वापरत होता की, तो कन्हैया होता याचा आता कोणालाच घेणंदेणं नव्हतं. त्याने कामेश्वर सिंहांची 37 एकर जमीन विकली! 1991 मध्ये कामेश्वर सिंहांचं निधन झालं. आणि त्याला कथित कन्हैयाला कामेश्वरची बरीच प्रॉपर्टी मिळाली. राम सखी देवी आणि कन्हैयाची बहीण विद्या त्याच्या विरोधात लढा सुरूच ठेवला. 1995 मध्ये राम सखी कन्हैयाच्या आई सुद्धा वारली.(Bihar)
================
हे देखील वाचा : Charlie Chaplin : आणि चार्ली चॅपलिनची डेड बॉडीच किडनॅप झाली !
================
पण विद्याने हा लढा पुढे नेला. कोर्टात खटला चालला, पण अनेक वर्ष तो सुरूच राहील हा कथित कन्हैया कधीच डीएनए टेस्ट द्यायला तयार झाला नाही. 2014 मध्ये कोर्टाने डीएनए टेस्टची मागणी केली, पण त्याने 8 वर्षं ती टाळली. शेवटी, 2023 मध्ये नालंदाच्या कोर्टात 44 दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सत्य बाहेर आलं. हा तरुण कन्हैया नव्हता, तो होता दयानंद गोसाई, जमुई जिल्ह्यातला एक भटका गवई. त्याने 41 वर्षं कन्हैया बनून सगळ्यांना फसवलं. कोर्टाने त्याला फसवणूक, बनावटपणा आणि कट रचल्याबद्दल दोषी ठरवलं आणि 7 वर्षांची शिक्षा सुनावली. ४१ वर्ष तो कन्हैया म्हणून जगत होता. त्याची ओळख वापरत होता.(Top Stories)
पण त्या दयानंद गोसाई इतकी वर्ष कन्हैया म्हणून त्या गावात कसा जगला आणि मुळात तो कन्हैया झालाच कसा. कारण त्यानेच लोकांना तो मुरगावतील जमीनदाराचा पोरगा आहे. असं सांगितलं होतं. तर त्याला कन्हैया बनवण्यात खूप मोठा कट होता. अशी शंका कोर्टाला आलीह होती. या कटात मुरगावातले अनेक लोक सामील होते, ज्यांनी गोसाईला सिंह कुटुंबाच्या हरवलेल्या मुलाच्या रूपात गावात आणलं. कदाचित सिंह कुटुंबाच्या जमिनी स्वस्तात विकत घेण्याच्या लालसेपोटी हे झालं असावं, ज्या गोसाईने नंतर विकल्या. राम सखी देवी याही मृत्यूपूर्वी हेच सांगत होत्या. मग प्रश्न आहे खरा कन्हैया कुठं गेला? त्याचा अपहरण झालं? खून झाला? की तो कुठं पळून गेला? त्याची एकच ब्लॅक अँड व्हाइट फोटो आजही कोर्टाच्या कागदांवर आहे, पण तो कुठे गेला हे रहस्य कायम आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics