हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ संकष्टी चतुर्थी येतात. जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हणले जाते. सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिना म्हटले की डोळ्यासमोर येतात अनेक व्रत आणि वैकल्य. या महिन्यात प्रत्येक दिवशी एक व्रत पळाले जाते. त्यामुळे अतिशय धार्मिक आणि पवित्र महिना म्हणून श्रावणाची ओळख आहे. यंदाचा श्रावण मात्र अजून एका कारणासाठी खास ठरणार आहे. कारण यंदा श्रवणामध्ये चक्क अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग आला आहे. मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे आणि चातुर्मासात अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. यावर्षी अतिशय शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्टी चतुर्थीचा अंगारक योग म्हणजे काय? संकष्ट चतुर्थी अंगारक योगाचे महत्व, वैशिष्ट्य जाणून घेऊया…(Todays Marathi Headline)
संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४० वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३५ वाजता होईल. उद्यतिथीनुसार संकष्टी चतुर्थी मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी आहे. ही चतुर्थी तिथी मंगळवारी येत असल्याने तिला अंगारकी चतुर्थी देखील म्हटले जाते. चंद्रोदय रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी होणार असून चंद्रदेवाचे दर्शन घेऊन त्यांना जल वाहून नमस्कार केल्यानंतर गणेशाची आरती करावी व मग उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले जाते. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक आहे. मात्र एक नक्की की, चंद्रदर्शन आणि पूजा केल्यांतरच हे व्रत पूर्ण होते. (Marathi Trending News)
अंगारक योग म्हणजे काय?
चतुर्थी तिथी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते. अंगारक म्हणजे मंगळ. या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष मानली जाते. अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले, तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते, शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी मान्यता आहे. अंगारकीचा उपवास केल्यास वर्षातील बारा संकष्टया केल्याचे पुण्य मिळते, अशी देखील मान्यता आहे. (Top Marathi News)
अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट असेल तर त्याचे लवकर निवारण होते. गणेशाने मंगळाला तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत निष्ठेने पाळले जाते. (Latest Marathi Headline)
अंगारकी चतुर्थीला काय करावे?
चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये. संकष्टीच्या दिवशी गणपतीला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. अंगारकी चतुर्थीला गणपती पूजन शक्य नसल्यास निदान गणरायाला एक दुर्वा अवश्य वाहावी. मनोभावे गणपतीचे नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते. तसेच गणपती अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे. आवर्तन करणे शक्य नसल्यास एकदा पठण करावे. गणपती अथर्वशीर्ष येत नसल्यास मनोभावे श्रवण करावे. अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा, असे सांगितले जाते. (Marathi Top News)
अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा. फलाहार, पाणी, दूध किंवा फळांचा रस घ्यावा. व्रतानुसार सर्व नियमांचे पालन करावे. तसेच या दिवशी गरजू लोकांना धन आणि धान्य दान करावं, गायीला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा. शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगी द्यावी. सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचे पुन्हा एकदा पूजन करुन संकष्टी व्रत कथेचे वाचन करावे. सायंकाळी पूजेवळी श्री गणेशाला चंदनाचं गंध लावावे आणि मोदक किंवा मोतीचूर लाडूंचा नैवद्य दाखवावा. चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकी चतुर्थी व्रत सोडावे. (Top Stories)
===================
हे देखील वाचा : shravan : श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ व्हायची?
Shravan : श्रावण विशेष : त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास
Tulsidas: रामचरितमानस ग्रंथाची रचना करणाऱ्या संत तुलसीदासांची आज जयंती
===================
हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो, असे जाणकार सांगतात. हनुमानाचीही पूजा फलदायी अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीसोबतच श्री हनुमानाची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानली जाते. या दिवशी व्यक्तीने शेंदूरचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातली सर्व विघ्नं, संकटं दूर होतात आणि त्याला सुख-समृद्धी प्राप्त होते. (social News)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. आम्ही याबद्दल कोणताही दावा करत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics