Home » Shravan : पवित्र महिना असूनही श्रावणात लग्न का करत नाही?

Shravan : पवित्र महिना असूनही श्रावणात लग्न का करत नाही?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shravan
Share

२५ जुलैपासून श्रावण महिना सुरु होत आहे. अतिशय पवित्र असणारा हा महिना महादेवाला समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते. श्रावणाला अध्यात्मिकदृष्या अनन्यसाधारण महत्व आहे. अतिशय पावन असणारा हा महिना अनेक गोष्टींसाठी शुभ समजला जातो. विविध धार्मिक पूजा या काळात करणे अतिशय चांगले समजले जाते. या संपूर्ण महिन्यांमध्ये अनेक शुभ कामे देखील केली जातात. कोणत्याही पूजेची, उपवासाची सुरुवात देखील श्रावण महिन्यापासूनच केली जाते. हिंदू धर्मामध्ये तर श्रावण महिना अतिशय पवित्र आणि पुण्यवान आहे, इतर अनेक कामांसाठी हा महिना शुभ समजला जातो मग तरी देखील या काळात लग्न का केले जात नाही? (Marathi News)

विधिवत लग्न करण्यासाठी कायम सर्वात आधी शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहिला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नाला मोठे महत्व आहे. मात्र जेवढे महत्व विधिवत लग्नाला आहे. तेवढेच महत्व लग्नाच्या शुभ मुहूर्ताला आणि शुभ दिवसाला देखील देण्यात आले आहे. श्रावण महिन्यात एकीकडे तरुण मुली चांगला नवरा मिळावा म्हणून पूजा करतात, व्रत करतात, उपवास करतात. तर विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या, मुलांच्या आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी माता पार्वती आणि महादेव यांची आराधना करतात. तर दुसरीकडे मात्र या काळात लग्न करणे निषिद्ध मानले जाते. मग हा विरोधाभास असण्याचे कारण काय? (Todays Marathi Headline)

Shravan

मात्र श्रावणात लग्न न करण्यामागे एक धार्मिक कारण आहे. श्रावण महिना चातुर्मास या पवित्र चार महिन्यांच्या काळात येतो. आषाढ एकादशी अर्थात देवशयनी एकादशीपासून सृष्टीचे चालक भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रेत म्हणजे गाढ ध्यानावस्थेत जातात. हिंदू धर्मात असे मानले जाते की, विवाहासारखे मंगल कार्य विष्णूंच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेत असतात तेव्हा संपूर्ण चातुर्मासात म्हणजेच श्रावण महिन्यात विवाह, वास्तुशांती, गृहप्रवेश यासारखे शुभ कार्यक्रम करता येत नाहीत. (Top Trending News)

जेव्हा भगवान विष्णू ध्यानात असतात. तेव्हा धरतीच्या संचालनाची जबाबदारी ही भगवान शंकरांवर असते. अशावेळी भगवान शंकराची याकाळात विशेष पूजा केली जाते. मात्र, ते स्वत: विवाह कार्यांमध्ये सहभागी होत नाहीत. लग्नातील अनेक विधींमध्ये भगवान विष्णूंना आवाहन केले जाते. त्यांचेच मंत्र अधिक म्हटले जातात. चार महिने भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याने याकाळात शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे श्रावण महिन्यात विवाह करणे शुभ मानले जात नाही. (Latest Marathi News)

देवशयनी एकादशीपासून ते देवउठनी एकादशी अर्थात कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मासाच्या काळ असतो. हा संपूर्ण काळ ४ महिन्यांचा असतो. हे ४ महिने चातुर्मास असल्याने या काळात लग्न, जावळ, घर बांधणी, घर गृहप्रवेश, वाहन खरेदी, नवीन मालमत्ता खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे यासारखी इतर अनेक शुभ कार्य केली जात नाहीत. (Top Stories)

=========

हे देखील वाचा : 

Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?

Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या

==========

दरम्यान भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे. त्यामुळेच या महिन्याचे हिंदू धर्मीयांमध्ये विशेष महत्त्व असते. येत्या २५ जुलै श्रावण शुक्ल प्रदिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तर, २३ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण अमावस्येला या महिन्याची समाप्ती होणार आहे. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार यंदाच्या श्रावणात ४ श्रावणी सोमवार येणार आहेत. पहिला श्रावणी सोमवार २८ जुलैला आहे. भगवान शंकराची पूजा, उपवास आणि विविध सणांचा महिना म्हणून श्रावणाला विशेष महत्त्व आहे. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.