सध्या सगळ्या भारतात एकच नाव गाजतंय… ते म्हणजे शुभांशू शुक्ला ! अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत तर ISS मध्ये जाणारे पहिलेच भारतीय ! आपल्या भारतीयांसाठी निश्चितच ही एक Proud Feeling गोष्ट आहे. पण अनेकजण अशा स्पेस मिशन्सचा विरोध करत आहेत. एकीकडे कित्येक भारतीयांचं अभिमानाने उर भरून आलं तर दुसरीकडे सोशल मीडियावर या कमेंट्सचा पूर आला, ‘अशा खर्चिक मोहिमांपेक्षा हा पैसा गरिबांना वाटला असता…’, ‘इकडे भाज्यांचे भाव वाढलेत आणि यांना अशा वायफळ गोष्टींमध्ये पैसा खर्च करण्याची दुर्बुद्धी कशी सुचते ? नुसता पैसा बर्बाद… या फालतू गोष्टींमधून काहीच साध्य होणार नाही ! (Space Mission)
पण हेच स्पेस मिशन्स का माणसासाठीच महत्त्वाचे आहेत, याबाबत एक सुंदर पत्र नासाच्या एका शास्त्रज्ञाने लिहिलं होतं, एक असं पत्र जे प्रत्येक माणसाने वाचायला हवं. विशेष म्हणजे त्यांनी या पत्रासोबत पृथ्वीचा एक डोळ्यांचं पारणं फेडणारा फोटोदेखील जोडला होता. तसं हे पत्र मराठी भाषांतर केलेलं आहे. पण याचा आशय सगळ्यांना समजावा एवढंच…स्पेस मिशन्स का महत्त्वाचे आहेत जे जाणून घेऊ.
१९७० साली झांबियामधल्या एका चर्च मधील सिस्टर मेरी युकांडा यांनी नासाचे डॉ अर्न्स्ट स्टॅलींगर यांना एक पत्र लिहिलं. जे त्यांच्या मंगळयान मोहिमेच्या संशोधना संदर्भात होतं. सिस्टर मेरी यांची विशेष करून डॉ स्टॅलींगर यांना हेच विचारायचं होतं की पृथ्वीवर असंख्य बालके कुपोषित असताना, नासा मंगळयान संशोधन आणि मोहिमेवर कोट्यावधी डॉलर्स खर्च करायचं धाडस कसं करू शकतं? (Space Mission)
यानंतर थोड्याच दिवसात डॉ स्टॅलींगर यांनी सिस्टर मेरी यांना खालील पत्र लिहिलं सोबत त्यांनी अंतराळवीर विल्यम अँडर्स यांनी 1968 साली चंद्रावरून पृथ्वीचा “अर्थ राईज” (Earth Rise) नावाचा एक अद्भुत फोटो पाठवला. या पत्राला त्यांनी “अवकाश भरारी कशासाठी” ( why explore space ?) असं नाव दिलं होतं. हे पत्र नासाने नंतर प्रकाशित केलं. ते पत्र पुढीलप्रमाणे…
६ मे १९७०
प्रिय सिस्टर मेरी,
मला अनेक पत्र मिळाली ज्यापैकी एक तुमचं होतं. तुमच्या पत्राचा आशय मला खूप सृजनशील आणि सयुक्तिक वाटला म्हणून मी तुमच्या पत्राचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करेन. सर्व प्रथम मला तुमचे आणि तुमच्या इतर सर्व संयमशील सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण की तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी झोकून दिलेलं आहे.
तुम्ही तुमच्या पत्रात भूतलावर असंख्य बालके कुपोषित असताना मंगळयान मोहिमेवर एवढा अगणित खर्च कशाला असा प्रश्न विचारलात, माझ्याकडून ” जेव्हा असंख्य बालके पृथ्वीवर कुपोषणामुळे मरत आहेत तेव्हा मी अवकाश संशोधनावर वायफळ खर्च करणार नाही ” अशा उथळ उत्तराची तुम्हाला नक्कीच अपेक्षा नाही. खर तर मंगळयान भरारी शक्य होण्याच्या कित्येक वर्ष आधी कुपोषित मुले आणि त्यांचं आयुष्य मी जवळून अनुभवलेलं आहे. तरीही माझ्या असंख्य मित्रांप्रमाणे माझा सुद्धा या गोष्टीवर विश्वास आहे की मानवाचे चंद्रावर आणि मंगळावर पोहोचण गरजेचं आहे.(Space Mission)
यामुळे पृथ्वीवर असलेल्या अनेक बहुचर्चित आणि दीर्घकालीन समस्या सोडवायला मदत होईल, असं मला वाटतं. या स्पेस मिशनद्वारे पृथ्वीवरील समस्या सोडवण्यास कशी मदत होईल, हे समजून सांगण्याआधी मला एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगायची आहे जी माझ्या या तथ्यांचा पाठपुरावा करते. जवळपास चारशे वर्षांपूर्वी जर्मनीतील एका छोट्या गावात एक दयाळू श्रीमंत माणूस राहत होता. तो आपल्या उत्पन्नातला मोठा हिस्सा गावातल्या गरिबांच्या उद्धारासाठी दान करायचा. गावात प्रचंड गरिबी… पण त्याच्या दानधर्मामुळे सर्वजण त्याची प्रशंसा करायचे. या मध्ययुगीन काळात रोगांच्या साथी आणि दुष्काळ यामुळे अनेक गरीब देशोधडीला लागले होते. त्यामुळे या श्रीमंत माणसाचं दानकर्म फार महत्त्वाचं ठरत होतं.
एक दिवशी या श्रीमंत माणसाला एक चमत्कारिक माणूस भेटला, ज्याच्याकडे स्वतःचं एक कामाचं टेबल आणि एक छोटेखानी प्रयोगशाळा होती. रात्री थोडा वेळ तरी या प्रयोगशाळेत काम करता येईल म्हणून तो दिवसभर इथे तिथे कष्ट करायचा जेणेकरून चार पैसे कमावता येतील. अशाच अनेक प्रयोगांपैकी एका प्रयोगासाठी तो काचांचे छोटे छोटे तुकडे एका नलिकेत जमवून त्यांची भिंगासारखी रचना करून सूक्ष्म गोष्टींचे निरीक्षण करायचा. त्यांनी बनवलेलं हे विचित्र उपकरण बघून तो श्रीमंत माणूस अचंबित झाला. त्यांनी अशा प्रकारची गोष्ट आत्तापर्यंत कुठेच बघितली नव्हती. उत्सुकतेपोटी त्याने या चमत्कारिक माणसाला त्याची प्रयोगशाळा आपल्याच घरात आणायला सांगितली आणि त्या उपकरणावर संशोधन करण्यासाठी पूर्ण पैसा मी लावतो, असं वचन दिलं. हे ऐकून गावातले गरीब लोकं त्यावर रागवले. “आम्ही इथे रोगांच्या साथीने मरत असताना तुम्ही आम्हाला मदत करायची सोडून त्या वेड्याच्या या विचित्रपणाला थारा देताच कसा?” असा त्यांचा आक्षेप होता. पण श्रीमंत माणसाने त्यांच्या या रागाला फार भीक घातली नाही. तो म्हणाला “जेवढी शक्य होईल तेवढी मदत मी तुम्हा सर्वांना करीनच परंतु या उपकरणावर खर्च करणे सुद्धा मला योग्य वाटतय आणि मला विश्वास आहे यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल”.(Space Mission)
त्या विचित्र माणसाच्या आणि अशा अनेकांच्या प्रयत्नांना अखेरीस यश आलं ज्यातून जन्माला आला “मायक्रोस्कोप”! हे तर सर्वज्ञात आहे की त्याच मायक्रोस्कोपमुळे कितीतरी साथीच्या रोगांवर समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी उत्तरं मिळाली आहेत. त्या श्रीमंत माणसाने या उपकरणाच्या संशोधनासाठी मदत करून नुसतेच गरिबांना पैसे वाटण्याऐवजी मानव जातीच्या कल्याणार्थ फारच मोठा हातभार लावला आहे हे मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही.
वरच्या कथेप्रमाणेच आपली काहीशी परिस्थिती आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती आपल्या वार्षिक अर्थसंकल्पावर साधारण वीस हजार कोटी डॉलर्स खर्च करतात. हा पैसा शारीरिक स्वास्थ्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, शहरांचं नूतनीकरण, रस्ते, दळणवळण, परकीय मदत, स्वसंरक्षण, विज्ञान, शेती तसच देशातील व देशाबाहेरील अनेक प्रकल्प यावर खर्च केला जातो. यातील १.६% निधी हा अवकाश संशोधनामध्ये अपोलो प्रकल्प आणि अनेक छोटे छोटे प्रकल्प जे फिजिक्स, Astronomy, बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग अशा विषयांवर निगडित असतात. हा खर्च शक्य होण्यासाठी सामान्य अमेरिकन नागरिक आपल्या १०००० डॉलर्स उत्पन्नापैकी फक्त ३० डॉलर्स स्पेस रिसर्च म्हणजे अंतराळ संशोधानासाठी देतो. (Top Stories)
यावर तुम्ही हा प्रश्न विचारण स्वाभाविक आहे की या ३० डॉलर्स पैकी ५ , ३ किंवा १ डॉलर कुपोषित मुलांच्या खर्चासाठी का वापरू नयेत? याचं उत्तर देण्यासाठी मला देशाची अर्थव्यवस्था कशी चालते हे आपल्याला थोडक्यात सांगावं लागेल. तसच थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती इतर देशांमध्ये सुद्धा आहे. आपलं सरकार जे विविध विभागांचं बनलेलं असतं. ही सर्व कार्यालये व विभाग आपापल्या वार्षिक कामांचा अंदाज व त्यानुसार वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतात, जो त्यांना लोकप्रतिनिधी व राष्ट्रपती यांच्यासमोर मांडून पास करून घ्यावा लागतो. हा संकल्प पास झाल्यानंतर आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर मांडलेल्या अर्थसंकल्पानुसार सर्व विभागात आणि कार्यालयांमध्ये वाटला जातो.(Space Mission)
आता अर्थातच राष्ट्रीय हवाई प्रकल्प व स्पेस रिसर्च विभागाच्या अर्थसंकल्पात अशाच कामांचा समावेश असतो जी या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येतात. उदाहरणार्थ स्पेस मिशनसाठी मांडलेला अर्थसंकल्प पास झाला नसता तर या अवकाश संशोधनाच्या कामासाठी मांडलेला वार्षिक निधी दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरला गेला नसता आणि अशा परिस्थितीत टॅक्स भरणाऱ्यांकडूनही संबंधित टॅक्स वसूल केला गेला नसता.
याच पार्श्वभूमीवर माझं असंदेखील म्हणण आहे की स्पेस मिशन व मंगळयान मोहीमेसारखे प्रकल्प बंद करूनच हे समाज कल्याणाचे काम साध्य होईल असे नाही. दोन्ही काम समांतर पद्धतीने शक्य आहेत. किंबहुना माझा विश्वास आहे की या स्पेस रिसर्चच्या कामात हातभार लावून मी भूकबळी, गरीबी, कुपोषण यासारख्या समस्यांवर भावी उपाय शोधून काढण्यास मदत करत आहे. (Top Stories)
भुक आणि गरिबी या समस्यांच्या मुळाशी दोन गोष्टी आहेत – अन्नाची निर्मिती आणि अन्न वाटप. काही देश अन्न निर्मितीच्या बाबतीत अग्रेसर आहेत तर काही देशात याची खूपच कमतरता आहे. या अग्रेसर देशांनी पाण्याचा, खताचा, उपलब्ध जागेचा अचूक वापर करून, हवामानाचा योग्य तो अंदाज लावून, पिकांचं व मातीचं स्वास्थ्य ओळखून आपापल्या देशात अन्ननिर्मिती वाढवली आहे.
या सर्वच मार्गांचा अजून विकास करण्याचं शाश्वत उत्तर म्हणजे मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह म्हणजेच Satellites! पृथ्वीपासून खूप खूप उंचीवर पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना हे Sattelites पृथ्वीवरील मोठ्या भूभागांचे एकाच वेळेस फोटो घेऊ शकतात, पाऊस, बर्फवृष्टी, पिकांची परिस्थिती, नद्यांची परिस्थिती यासंदर्भातील माहिती गोळा करून ती रेडिओ वेव्हजच्या माध्यमातून पृथ्वीवरील डेटा सेंटरला परत पाठवू शकतात. नुकतच या सर्व उपलब्ध तंत्रज्ञानामुळे असा अंदाज बांधण्यात आला आहे की अशा उपलब्ध माहितीमुळे अन्नाचे उत्पादन हजार कोटी डॉलर्सने वाढवता येईल.(Space Mission)
या समस्यांचा दुसरा पैलू म्हणजे अन्न वाटप ज्याचा अवकाश संशोधनाशी संबंध नाही. हा प्रश्न आंतरराष्ट्रीय ताळमेळ व राजकारण याच्याशी निगडित आहे. छोट्या गरजू देशाच्या या सरकारला मोठ्या विकसित राष्ट्राकडून आपली अन्नाची गरज भागवून घेण्यात रास्त न वाटण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्या मागून येणारं विकसित राष्ट्रांच्या अपेक्षांचं आणि उपकाराचं ओझ. देशादेशांतील राजकारण, तेढ, बॉर्डर्स अजून खुल्या झाल्याशिवाय या समस्यांवर उपाय मिळेल अस वाटत नाही आणि याचीच भीती आहे. पण मला हा विश्वास आहे की या समस्यांडून उत्तराकडे मार्गक्रमण करताना अवकाश संशोधन हा महत्त्वाचा टप्पा लागतो. (Top Stories)
कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने वाढलेली अन्ननिर्मिती आणि सुधारलेल्या अंतरराष्ट्रीय संबंधांमुळे सुधारलेलं अन्न वाटप ही दोन उदाहरण अवकाश संशोधनाच्या बाबतीत भौतिक आयुष्य कस सुधारू शकतात याचे मार्गदर्शक आहेत. मला आपल्याला अजून एक दोन उदाहरण सांगायला आवडतील जी तांत्रिक प्रगती आणि वैज्ञानिक संशोधन यांच्याशी निगडीत आहेत. चांद्रयानातील विविध उपकरणांचा अचूकपणा ही बाब अभूतपूर्व गोष्ट आहे. या सर्व उपकरणांची निर्मिती करताना आपल्याला नवीन पदार्थ, रसायन यांचं संशोधन करायला सुद्धा मदत झाली. त्यामुळे या उपकरणांचा कार्यकाळ वाढला. इतकच नाही तर निसर्गाचे नवीन नियम सुद्धा कळले.
प्रत्येक वर्षी स्पेस रिसर्च मधील अनेक नवे शोध पृथ्वीवरील भौतिक जीवन सुधारण्यासाठी उपयोगी पडतात. अगदी जेवणाच्या गोष्टींपासून ते शेती उपकरणं, शिवण यंत्र, रेडिओ उपकरणं, जहाज व विमानातील उपकरणं, हवामानाचा अंदाज लावणारी उपकरणं, संपर्काची उपकरणं, वैद्यकीय उपकरणं.इथपर्यंत हे शोध उपयोगी आहेत. जर मानवाचं जीवनमान सुधारायच असेल तर आणखी नवीन तंत्रज्ञान शोधण्याची खरच गरज आहे. आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यात अधिक संशोधनाची गरज आहे. ज्यातून मानवाला भूकबळी, गरीबी, कुपोषण, प्रदूषण अशा जटिल समस्यांवर उपाय मिळेल. याकरिता जास्तीतजास्त तरुण-तरुणींनी संशोधन क्षेत्रात झोकून देऊन करिअर करण्याची गरज व संधी सुद्धा आहे. (Top Stories)
अमेरिकन सरकारने ज्या ज्या गोष्टींसाठी निधी ठरवला आहे आणि ज्यांचं काम ठळकपणे दिसून येतं त्यात अवकाश संशोधन आणि मोहिमा यांचं नाव आग्रहाने व अभिमानाने घेण्यासारख आहे. ही गोष्टसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की स्पेस रिसर्च होणारा खर्च एकूण अर्थसंकल्पाच्या १.६% टक्केच आहे. याच अनुषंगाने मी हे सुद्धा म्हणण्यास कचरणार नाही की अवकाश संशोधनाने मागील तीन चार हजार वर्षांच्या युद्धखोर इतिहासाला सुद्धा मागे टाकल आहे.
देशादेशांतील स्पर्धा युद्धसामग्री, बॉम्ब, बंदुका बनवण्याऐवजी मंगळयान, चांद्रयान बनवण्यात लागली तर केवढा नरसंहार टळेल या कल्पनेने सुद्धा मन सुखावत. ही स्पर्धा समृद्ध भविष्याची नांदी ठरेल! मी सोबत जोडलेला फोटो हा आपल्या अतिप्रिय पृथ्वीचा चंद्रावरून घेतलेला फोटो आहे. पृथ्वीचा आजवरच्या इतिहासातील हा नक्कीच अभूतपूर्व क्षण होता. या फोटोमुळे ही पृथ्वी आपली आहे, माझी आहे आणि ती सुंदर आहे आणि यावरील समस्या किती गहन आहेत, कठीण आहेत याची जी दुर्दैवी जाणीव अधिकाधिक लोकांना झाली. (Top Stories)
हे अवकाश पर्व आपल्यासमोर प्रश्नांचा आणि त्यातच दडलेल्या उत्तरांचा एक आरसा घेऊन उभ ठाकलं आहे. समस्यांशी दोन हात करण्याचा आशावाद पण याच अवकाश पर्वाने दिला आहे. अल्बर्ट श्र्वैत्झर यांनी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की “मी भविष्याकडे काळजीने पण सकारात्मक अपेक्षेने बघतो” अवकाश पर्वाने देखील आपल्याला हेच शिकवले नाही का ?
माझ्या शुभेच्छा तुमच्या व तुमच्या मुलांच्या बरोबर कायमच राहतील !
सदैव तुमचाच
डॉ स्टालींगर.
=================
हे देखील वाचा : Shubhanshu Shukla : अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची प्रेमकहाणी देखील आहे खूपच खास
=================
हे पत्र ऐकून तुम्हालाही कळून चुकलं असेल स्पेस मिशन दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नाहीत, तर माणसासाठी आहेत आणि या पृथ्वीच्या कल्याणासाठी आहेत.