Monsoon Skin Care : पावसाळा हा हवामानात गारवा, दमटपणा आणि ओलसरपणा घेऊन येतो. या ऋतूमध्ये हवा आर्द्र असल्यामुळे त्वचेवर बुरशी (फंगल) वाढण्याची शक्यता खूप वाढते. बुरशीजन्य संसर्गामुळे खाज, लालसर चट्टे, त्वचेवर पुरळ, त्वचा सोलून निघणे, अंगावर वास येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः सांधे, बोटांमधील जागा, मान, पाठीमागचा भाग किंवा घाम येणाऱ्या भागांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. औषधोपचाराशिवाय काही घरगुती उपाय नियमित केल्यास या समस्येपासून सहज बचाव करता येतो.
१. अंघोळीमध्ये अॅंटिफंगल वस्तूंचा वापर
पावसाळ्यात रोज एकदा तरी कोमट पाण्याने आंघोळ करणे आवश्यक आहे. पाण्यात २ चमचे सैंधव मीठ किंवा अर्धा चमचा हळद टाकल्यास त्याचे अॅंटिफंगल आणि अँटीसेप्टिक गुण फंगल इन्फेक्शनपासून त्वचेला संरक्षण देतात. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि त्वचेवरची खाज, लालसरपणा कमी करते.
२. नारळाचे किंवा टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल आणि नारळ तेल यांचे मिश्रण फंगल इन्फेक्शनवर अतिशय प्रभावी आहे. १ चमचा नारळ तेलात ३-४ थेंब टी ट्री ऑइल टाकून प्रभावित भागावर हलक्याने लावावे. दिवसातून दोन वेळा वापरल्यास इन्फेक्शन बरे होण्यास मदत होते. याशिवाय, लसूणही फंगल संसर्गावर उपयोगी पडते. लसूण कुस्करून त्याचा रस थेट त्वचेला लावता येतो.

Monsoon Skin Care
३. त्वचा कोरडी ठेवणे
पावसाळ्यात कपडे भिजल्यास त्वचेवर सतत ओलसरपणा राहतो. त्यामुळे त्वचेच्या घडीत किंवा सांध्यांमध्ये बुरशी वाढते. म्हणून नेहमी कोरडे, सैलसर आणि सूती कपडे वापरणे योग्य ठरते. भिजलेले कपडे त्वचेवर ठेवू नयेत आणि बूट व मोजे वेळेवर बदलावे. पायात हवा खेळेल अशा चपला वापराव्यात.
============
हे ही वाचा :
Health : त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे जास्वंदीचे फुल
Water : दिवसभरात किती पाणी प्यावे?, जास्त पाणी पिण्याचे तोटे
=============
४. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे
सशक्त रोगप्रतिकारशक्ती ही फंगल संसर्गाला दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. अन्नात हळद, लसूण, आल्याचा रस, तसेच दही यांचा समावेश करावा. दहीत असलेले प्रोबायोटिक्स शरीरात चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात, ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. तसेच पुरेसे पाणी पिणे, फळे व भाज्यांचा आहार घेणे देखील गरजेचे आहे.(Monsoon Skin Care)
५. बेकिंग सोडा व लिंबाचा उपयोग
बेकिंग सोडामध्ये अॅंटिफंगल गुणधर्म असतात. प्रभावित भागावर बेकिंग सोडा आणि पाण्याचे पेस्ट लावल्यास खाज कमी होते. तसेच, लिंबाचा रस थेट त्वचेवर लावल्यास बुरशीचा नाश होतो. मात्र लिंबाचा वापर संवेदनशील त्वचेवर न करता थोड्या प्रमाणात आणि पाण्यात मिसळून करावा.