Home » Plane Crash : विमान, हेलिकॉप्टर अपघातात भारतातील ‘या’ दिग्गज लोकांचा झाला मृत्यू

Plane Crash : विमान, हेलिकॉप्टर अपघातात भारतातील ‘या’ दिग्गज लोकांचा झाला मृत्यू

by Jyotsna Kulkarni
0 comment
Plane Crash
Share

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान गुरुवारी १२ जून रोजी दुपारी १.३० च्या सुमारास कोसळून भीषण अपघात झाला होता. या एअर इंडियाच्या बोइंग 787 या प्रवासी विमानातून क्रू मेंबर्ससह 244 प्रवासी प्रवास करत होते. यातला फक्त एकच प्रवासी वाचला बाकी सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. हे विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच मेघानी परिसरात मेडिकल स्टुडंटन्सच्या होस्टेलवर कोसळले. या अपघातामध्ये मृत झालेल्या लोकांना ओळखणे देखील कठीण झाले आहे. डीएनए टेस्ट करून मृतांची ओळख पटवली जात आहे. सध्या हे काम खूपच जोरात सुरु आहे.(Plane Crash)

या मोठ्या दुर्दैवी अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. त्याआधीच त्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात होता. यापूर्वी भारतात अनेक मोठे विमान अपघात झाले, ज्यात अनेक नामचीन व्यक्तींनी , नेत्यांनी आपले प्राण गमावले जाणून घेऊया त्यांच्याबद्दल… (Marathi News)

संजय गांधी
संजय गांधी भारताच्या पहिला महिला पंतप्रधान असलेल्या आयर्न लेडी इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र आणि काँग्रेसचे भावी नेते संजय गांधी यांचे २३ जून १९८० रोजी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ खाजगी विमान कोसळून निधन झाले. संजय गांधी यांना विमान उडवण्याची त्यांना विशेष आवड होती. अपघाताच्या वेळी ते एका नव्या विमानाची चाचणी घेत होते. या दुर्घटनेत पायलट सक्सेना यांचाही मृत्यू झाला. संजय गांधी यांना इंदिरा गांधींचे राजकीय वारसदार मानले जात होते. (Marathi Top Headline)

Plane Crash

जनरल बिपिन रावत
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि ११ जणांचा मृत्यू झाला होता. (Todays Marathi Headline)

Plane Crash

सायप्रियन संगमा
मेघालयाचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन संगमा यांचे २२ सप्टेंबर २००४ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. ते गुवाहाटीहून शिलाँगला पवन हंस या हेलिकॉप्टरने जात होते आणि त्यांच्यासोबत नऊ जण होते. त्यांचे हेलिकॉप्टर गुवाहाटी राज्याच्या राजधानीपासून फक्त २० किमी अंतरावर असलेल्या बारापाणी तलावाजवळ कोसळले होते. (Marathi Latest News)

Plane Crash

माधवराव सिंधिया
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत सिंधिया यांच्यासोबतच सात जणांचे देखील निधन झाले होते. ग्वाल्हेरचे लोकसभा सदस्य असलेल्या सिंधिया यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला होता. (Marathi Top News)

Plane Crash

दोरजी खांडू
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. २००७ पासून ते मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होते. दोरजी खांडू हे चार जणांसोबत तवांगहून इटानगरला जात होते. त्यांचे हेलिकॉप्टर राज्याच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात कोसळले होते.

Plane Crash

जी. एम. सी. बालयोगी
तेव्हाचे लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते जी. एम. सी. बालयोगी यांचे ३ मार्च २००२ रोजी आंध्र प्रदेशातील काकीनाडा परिसरात हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

Plane Crash

वाय. एस. राजशेखर रेड्डी
आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी रुद्रकोंडा टेकड्यांमध्ये हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. या दुर्घटनेत रेड्डीसह चार जणांचा मृत्यू झाला. (Social News)

Plane Crash

=========

हे देखील वाचा : Fathers Day : जाणून घ्या फादर्स डे चा इतिहास आणि महत्व

========= 

ओम प्रकाश जिंदाल आणि सुरेंद्र सिंह
हरियाणाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री ओम प्रकाश जिंदाल यांचे २००५ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. त्यांच्यासोबत मंत्री सुरेंद्र सिंह होते. दोन्ही नेते हेलिकॉप्टरने दिल्लीहून चंदीगडला जात होते. मात्र उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले आणि या अपघातात ओम प्रकाश जिंदाल आणि सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला होता.

Plane Crash


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.