Home » Iran-Israel War : इराण – इस्रायल संघर्षाचा भारतावर काय परिणाम ?

Iran-Israel War : इराण – इस्रायल संघर्षाचा भारतावर काय परिणाम ?

by Team Gajawaja
0 comment
Iran-Israel War
Share

इराण आणि इस्रायल, हे दोन देश गेल्या कित्येक दशकांपासून एकमेकांशी भांडताहेत. याचं मूळ कारण आहे धार्मिक, राजकीय आणि भौगोलिक वाद. इस्रायलला वाटतं की इराण त्यांच्या देशाच्या अस्तित्वासाठी धोका आहे, कारण इराणचं न्यूक्लियर प्रोग्राम आणि त्यांचा इस्रायलविरोधी आक्रमक दृष्टिकोन. दुसरीकडे, इराणला असं वाटतं की इस्रायल आणि अमेरिका त्यांच्या देशाला कमजोर करायला टपले आहेत. आता हा सगळा खटका इतका वाढलाय की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय, 13 जून 2025 च्या पहाटे, इस्रायलच्या हवाई दलानं इराणवर जोरदार हल्ला चढवला. यात त्यांनी इराणच्या न्यूक्लियर साइट्स वर आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यात काही वारिष्ठ लष्करी अधिकारी आणि न्यूक्लियर सायंटिस्ट मारले गेले. इस्रायलच्या या हल्ल्याचं नाव होतं ऑपरेशन रायझिंग लायन. इराणच्या nuclear weapons बनवण्याच्या योजनेला हा मोठा धक्का होता. पण यामुळे इस्रायल आणि इराणमधलं हे युद्ध आता आणखी पेटलं आहे. इराणने ही इस्रायलवर हल्ला केला आहे. त्यामुळे या दोन देशात काहीतरी मोठं घडणार आहे का? या दोन देशातील संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो? त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? हे सगळं जाणून घेऊ.(Iran-Israel War)

इस्रायल आणि इराण यांच्यातलं वैर हे नवं नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून मिडल ईस्टमध्ये या दोन देशांमधलं वातावरण तणावाचं आहे. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली, आणि तिथली सत्ता आयातोल्ला खोमेनी यांच्या हाती गेली. त्यानंतर इराणने इस्रायलला आपला शत्रू म्हणून घोषित केलं. इराणच्या नेत्यांनी वारंवार इस्रायलला नष्ट करण्याची भाषा केली. दुसरीकडे, इराणचा न्यूक्लियर प्रोग्राम हा सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा. इराण सातत्याने म्हणतंय, “आम्ही फक्त वीज निर्मितीसाठी न्यूक्लियर technology विकसित करतोय.” पण इस्रायल आणि अमेरिकेला यावर विश्वास नाही. त्यांचं म्हणणं आहे, इराण nuclear weapons बनवतंय, आणि जर ते बनले, तर ते इजराईलसाठी, मिडल ईस्ट साठी आणि जगासाठी मोठा धोका ठरेल.
इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत इराणने युरेनियम Enrichment खूप वेगाने वाढवलंय. इराणने युरेनियम 60% शुद्ध केलं आहे, आणि अणुबॉमसाठी 90% शुद्धता लागते. इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेनं अंदाज दिला होता की इराण लवकरच इस्रायलवर हल्ला करू शकतो.(Political News)

त्यामुळे इस्रायलनं आधीच तयारी केली, आणि १३ जूनच्या पहाटे 3:30 वाजता, इजराईलच्या फायटर जेट्सनी इराणच्या आकाशात प्रवेश केला. त्यांनी तेहरान, अराक, नटांझ आणि इस्फहान या चार न्यूक्लियर साईट्सवर, याशिवाय तबरीझ आणि करमनशहा इथल्या लष्करी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात नटांझ इथला युरेनियम एनरिचमेंट प्लॅन्टचं मोठं नुकसान झालं. असं बोललं जातंय की हा प्लॅन्ट हा इराणच्या न्यूक्लियर प्रोग्रामचा कणा होता.
शिवाय या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख कमांडर होसैन सलामी, चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बघेरी, आणि अनबिया सेंट्रल हेडक्वार्टरचे चीफ गुलाम अली रशीद यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी मारले गेले. असं बोललं जात आहे. इस्रायलनं फक्त इस्रायलच्या प्लांटसवर आणि लष्करी तळांवरच हल्ला केला नाही, तर इराणच्या न्यूक्लियर प्रोग्रामच्या मेंदूंना – म्हणजे सायंटिस्ट्सना – टार्गेट केलं गेल्याची माहिती आहे. मोसादच्या गुप्त ऑपरेशन्सनी इराणच्या आत ड्रोन्स आणि स्फोटकं घुसवली.(Iran-Israel War)

या हल्ल्यात इराणचे दोन प्रमुख न्यूक्लियर सायंटिस्ट्स, मोहम्मद महदी तेहरानची आणि फेरेदून अब्बासी, यांचा मृत्यू झाला. इराणच्या लष्करासाठी आणि न्यूक्लिअर प्रोग्रामसाठी हा खूप मोठा धक्का आहे.हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशाला आणि जगाला उद्देशून एक भाषण केलं. ते म्हणाले, “इराण गेल्या अनेक वर्षांपासून nuclear weapons बनवण्याची तयारी करतंय, त्यांनी नऊ अणुबॉम्ब बनवण्याइतका युरेनियम साठवला आहे. पुढच्या तीन वर्षांत 10,000 बॅलिस्टिक मिसाईल्स बनवायची त्यांची योजना आहे, जी काही मिनिटांत इस्रायलपर्यंत पोहोचू शकतात. जर इराणने nuclear weapons बनवले, तर ते दहशतवादी संघटनांच्या हातात जाऊ शकतात आणि ते जगासाठी धोकादायक ठरेल.(International News)

इस्रायलच्या हल्ल्याने इराण शांत बसणार नव्हतचं, हल्ल्यानंतर आयातोल्ला खामेनी, ज्यांना इराणचे सुप्रीम लीडर बोललं जातं, त्यांनी एक्सवर पोस्ट केली, “इस्रायलला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल. आमचं लष्कर इस्रायलला शिक्षा देईल.” असं ते म्हणाले आणि त्याच दिवशी इराणने इजराईलच्या दिशेने 100 ड्रोन सोडले आणि हल्ले केले. इस्रायलनेही आपली हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली आणि हे ड्रोन्स पाडायला सुरुवात केली. पण तेल अवीवसारख्या शहरांमध्ये काही मिसाइल्स पडले.(Iran-Israel War)

इस्रायलने इराणवर केलेला हल्ला हा अमेरिकेच्या इशाऱ्याने झाला नाही, असं इस्रायल आणि अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट् मार्को रुबियो यांनी स्पष्ट केलं. पण इराणने आधीच धमकी दिली होती की, जर इजराईलने हल्ला केला, तर त्याला अमेरिका जबाबदार असेल.मेरिकेला इराणच्या न्यूक्लियर प्रोग्रामची कायम भीती होती. 2015 मध्ये अमेरिकेने इराणसोबत ‘जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन’ करार केला होता, ज्यामुळे इराणनं न्यूक्लियर प्रोग्राम थांबवलं आणि त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध कमी झाले. पण 2018 मध्ये ट्रम्प यांनी हा करार मोडला. त्यामुळे इराणने पुन्हा आपला न्यूक्लिअर प्रोग्राम वेगाने सुरू केला. आता या हल्ल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे.(Top Stories)

=================

हे देखील वाचा : Flight : विमान प्रवासात मोबाईलला Flight Mode वर ठेवण्यास का सांगतात?

=================

भारतासाठी हे युद्ध चिंतेचा विषय आहे. मिडल ईस्टमधून भारताला मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करावं लागतं. इस्राइलच्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती 10% नी वाढल्या. याचा थेट परिणाम भारतातल्या इंधनाच्या किंमतींवर होऊ शकतो. पेट्रोल-डिझेल महाग झालं, तर सगळ्याच गोष्टींच्या किंमती वाढतील. थोडक्यात इस्रायल इराण संघर्ष आणखी वाढला तर मिडल ईस्टमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. याचा परिणाम तेलाच्या किंमती, जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थांवर होईल. त्याशिवाय मिडल ईस्टमध्ये अनेक भारतीय कामासाठी राहतात, युद्धामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भारतीय दूतावासाने इराण, इस्रायल आणि इराकमधल्या भारतीयांना सावध राहण्यास सांगितलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहूशी फोनवर चर्चा केली आणि तणाव कमी करण्याचं आवाहन केलं. भारताची भूमिका ही शांतता आणि कूटनीतीची आहे, आणि भारताला या युद्धात थेट सहभागी व्हायचं नाही. पण जर हे युद्ध आणखी वाढलं, तर भारताला आपली इंधन आणि आर्थिक धोरणं पुन्हा नव्याने आखावी लागतील.(Iran-Israel War)

इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीने सांगितलंय की, इस्राइलच्या हल्ल्यात इराणच्या इस्फहानमधील न्यूक्लिअर साईटचं नुकसान झालं नाही, पण इतर साईट्सचं नुकसान आणि रेडिएशन लेव्हल याबाबत तपास सुरू आहे. जर रेडिएशनचा धोका निर्माण झाला, तर पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर long टर्म परिणाम होऊ शकतात. आता हा संघर्ष थांबणार की आणखी भडकणार, हे सांगणं कठीण आहे. आता या दोन देशांमध्ये पुढे काही मोठं घडणार का हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? हा संघर्ष थांबेल की वाढेल आम्हाला कोममेंट्समध्ये नक्की सांगा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.