सध्या मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी खून प्रकरण सध्या संपूर्ण देशात कमालीचे गाजत आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी यांचे मे मध्ये लग्न झाले आणि त्यानंतर ते दोघं त्यांचा मधुचंद्र साजरा करायला गेले. मात्र इथेच सर्व घात झाला. याच मधुचंद्राच्या दिवसात ते फिरत असताना अचानक राजाचा मृतदेह मेघालयतील शिलाँग येथे खोल दरीत सापडला होता. राजाचा मृतदेह सापडला पण सोनम मात्र बेपत्ता होती. राजा दरीत पडला कसा? सोनम कुठे गेली? राजा कधी पडला की त्याला पडले? सोनमचे कोणी अपहरण केले का? आदी अनेक प्रश्न पोलिसांना आणि लोकांना पडले होते. अशातच राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिने केल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. (Raja Raghuvanshi)
मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेली सोनम रघुवंशी समोर आली असून तिने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळत या प्रकरणाचा उलगडा देखील झाला आहे. सोनम पोलिसांसमोर येऊन या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला आहे. सोनमने पोलिसांना कबुली दिली आहे की, सोनमने रघुवंशीने प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून भाड्याच्या मारेकऱ्यांना पती राजाच्या हत्येची सुपारी दिली होती. सोनमच्या या कबुलीनाम्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (Marathi News)
या सर्व गोष्टींची पृष्टी पोलिसांनी देखील केली आहे. सोनमचे तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या राज कुशवाहसोबत लग्नाआधीपासूनच प्रेमसंबंध होते. सोनमच या हत्याकांडाची खरी मास्टरमाइंड आहे. सोनमच्या वडिलांची इंदूर येथे एक छोटी प्लायवूड फॅक्टरी आहे. त्याच फॅक्ट्रीमध्ये राज कुशवाह नोकरी करायचा. सोनम नेहमीच फॅक्टरीमधल्या ऑफिसला यायची. इथेच दोघांमध्ये प्रेमसंबंध बहरले. पोलिसांनुसार, याच प्रेमसंबंधामुळे सोनमने राज कुशवाहसोबत मिळून राजा रघुवंशी म्हणजे नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. (Top Stories)
इंदूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असलेला राजा रघुवंशी आणि सोनमचे ११ मे रोजी दणक्यात लग्न झाले. लग्नाच्या नऊ दिवसानंतर २० मे रोजी हे दोघं त्यांच्या हनिमूनसाठी मेघालयला गेले. याच दरम्यान २२ मे रोजी भाड्याची स्कूटर घेऊन ते मावलखियाट गावात पोहोचले. ते तिथे ३००० पेक्षा अधिक शिड्या उतरुन नोंग्रियाट गावात ‘लिविंग रूट्स’ पूल पहायला गेले होते. या जोडप्याने नोंग्रियाटच्या शिपारा होमस्टेमध्येच रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी त्यांनी चेकआऊट केले. त्यानंतर हे दोघं अचानक बेपत्ता झाले. २४ मे रोजी त्यांची स्कूटर शिलांग-सोहरा मार्गावर सोहरारिम येथे एका कॅफेजवळ बेवारस अवस्थेत सापडली. २ जून रोजी वेईसावडॉन्ग तळ्याजवळ एका खोल दरीत राजाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला. त्यानंतर या प्रकरणाला तोंड फुटले. (Marathi Top HEadline)
सोनमचे राजा रघुवंशीसोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या सहाच दिवसात सोनमने राजला सोबत धरून राजाच्या हत्येचा कट रचला. सोनमसोबत प्लॅन झाल्यानंतर राजने त्याचा मित्र असलेल्या विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांनाही कटात सहभागी करून घेतली. ज्यावेळी राजा आणि सोनम हनिमूनसाठी शिलाँगला पोहोचले. तेव्हा विशाल, आनंद आणि आकाश हे तिघेही तिथे पोहोचले. संधी साधून तिघांनी प्लॅन करून राजाची हत्या केली. सोनम स्वत: राजला हत्येच्या ठिकाणी घेऊन गेली होती. (Marathi Latest News)
राजा रघुवंशी हत्याकांडात आकाश नावाच्या तरुणाला ललितपूर येथून अटक करण्यात आली. आकाश हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. रविवारी रात्री उशिरा मेघालय पोलिसांनी सागर येथून आरोपी आनंदला अटक केली.
सोनम रघुवंशीचे वडील देवी सिंह यांनी म्हटले आहे की त्यांची मुलगी सोनम निर्दोष आहे. एवढेच नाही तर त्यांनी मेघालय पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात की, “हे लग्न दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने झालं. मेघालय सरकार पहिल्या दिवसापासून खोटे बोलत आहे. माझी मुलगी काल रात्री गाजीपूरमधील एका ढाब्यावर आली आणि तिच्या भावाला फोन केला. पोलिस ढाब्यावर गेले आणि तिथून तिला घेऊन गेले. मी माझ्या मुलीशी बोलू शकलो नाही. माझी मुलगी तिच्या पतीला का मारेल? माझी मुलगी १०० टक्के निर्दोष आहे.” (Top Marathi Headline)
दरम्यान सोनमला गाझीपूर जिल्ह्यातील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली. ती रडत होती आणि भावाला कॉल करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र या प्रकरणात तेव्हा नवीन वळण मिळाले जेव्हा मावलाखियात येथील एका टूरिस्ट गाईडने दावा केला होता की, २३ मे रोजी बेपत्ता होण्यापूर्वी या जोडप्यासोबत तीन अनोळखी पुरुष दिसले होते. गाईडच्या जबाबानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले. मावलखियातचे गाईड अल्बर्ट पीडी यांनी सांगितले की, २३ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांनी या जोडप्याला तीन पुरुष पर्यटकांसोबत नोंग्रियात ते मावलखियातपर्यंत ३००० पेक्षा जास्त पायऱ्या चढताना पाहिले होते. (Social News)
===============
हे देखील वाचा : Chatrapati Shivaji Maharaj : महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाबद्दलची रंजक तथ्ये
===============
टुरिस्ट गाईडने पोलिसांना सांगितले होते की, त्यांनी या जोडप्याला ओळखले कारण त्यांनी एक दिवस आधीच त्यांना नोंग्रियातपर्यंत खाली उतरण्यासाठी सेवा देण्याची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी नकार देत दुसऱ्या गाईडला सोबत घेतले. गाईडने पुढे हे देखील सांगितले की, चारही पुरुष पुढे चालत होते, तर महिला त्यांच्या मागे होती. ते चारही पुरुष हिंदीमध्ये बोलत होते, पण ते काय बोलत होते हे त्या गाईडला समजले नाही, कारण त्याला फक्त खासी आणि इंग्रजीच येते. याच माहितीनंतर पोलिसांना दुसऱ्या अँगलने या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आणि या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. (Top Trending News)