२२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आणि याचा बदला म्हणून पाकिस्तानने देखील भारतावर अनेक निर्बंध लादले आहेत. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या आणि युद्धजन्य पार्श्वभूमीवर भारत सरकारने ७ मे रोजी २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. युद्ध स्थितीचा कसा सामना करायचा त्यासाठी हे मॉक ड्रील आहे. (Mock Drill)
या सरावाचा उद्देश आपल्या नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि नागरी संरक्षण तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षित करणे आहे. या सरावात, नागरिकांना हल्ल्यादरम्यान सुरक्षित राहण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. १९७१ नंतरचा हा भारतातील पहिलाच मोठा नागरी संरक्षण मॉक ड्रिल असणार आहे. सिविल डिफेंस म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉक ड्रीलमागे उद्देश आहे. देशात शेवटची मॉक ड्रील १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी झाली होती. मॉक ड्रिल म्हणजे काय? ऑल-आउट वॉर स्थितीत काय करावं? आदी सर्वच गोष्टींची इत्यंभूत माहिती जाणून घ्या. (What is Mock Drill?)
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संभाव्य युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. भारतीय नागरिकांना या युद्धासाठी सज्ज करण्याचं काम आता सुरु करण्यात आले आहे. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून बुधवारी देशव्यापी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. या मॉकड्रीलमधून नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. (Mock Drill Information In Marathi )
शाळा, मॉल, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी हे मॉक ड्रील करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. या काळात, विद्यार्थी आणि नागरी संरक्षणाशी संबंधित लोकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. मॉक ड्रील हे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सामान्य जनता, सुरक्षा कर्मचारी आणि बचाव पथकांचा तात्काळ प्रतिसाद आणि तयारी तपासणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. (Top Marathi News)
=======
हे देखील वाचा : WAVES : वेव्हज समिट : ‘पुष्पा 2’ सिनेमाने बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य
=======
मॉक ड्रिल म्हणजे काय?
मॉक ड्रिल हा एक पूर्व नियोजित सराव असतो. यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रुपांतर केलं जातं. आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतात हे पाहिलं जातं. मॉक ड्रिलदरम्यान कुठेतरी आग लागली, दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाल्याचं वातावरण निर्माण केलं जातं. लोकांना अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढणं आणि मदतकार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया केली जाते. यात विशिष्ट परिस्थितीचे अनुकरण केले जाते आणि त्याचा सराव केला जातो. मॉक ड्रिल हे एक प्रशिक्षण तंत्र आहे. एखाद्या व्यक्तीला वास्तविक जीवनात उद्भवू शकणाऱ्या परिस्थितींसाठी तयार करणे हा यामागचा उद्देश आहे.(Marathi Latest News)
मॉक ड्रिल आवश्यक का असते?
आजच्या काळात जर आपत्कालिन परिस्थिती आलीच तर त्यासाठी आधीच तयार असणे आवश्यक आहे. मॉक ड्रिलच्या माध्यमातून काही गोष्टींची तपासणी केली जाते. जसे की,
* धोक्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य कसे वागतात ते बघणे?
* सुरक्षा कर्मचारी आणि बचाव टीम किती तत्परतेने प्रतिसाद देत आहेत.
* विद्यमान सुरक्षा उपकरण आणि अलर्ट प्रणाली किती प्रभावी आहे?
* कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे ?
मॉक ड्रिल कसे होते?
आधी ठरवलेल्या वेळेनुसार अलार्म किंवा अलर्ट वाजतो. यानंतर लोकांना परिस्थिती काय आहे ते सांगितले जाते. जसे की आग, बॉम्बचा धोका किंवा भूकंप यानंतर सर्वांना जलद आणि सुरक्षितपणे बाहेर काढले जाते. अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचतात.संपूर्ण प्रक्रियेचे मूल्यांकन करून त्यात किती वेळ लागला, कोणत्या कमतरता होत्या आणि काय चांगले करता येईल हे पाहिले जाते. (Marathi Top Stories)
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल दरम्यान राज्यांनी ५ गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.
१. हवाई हल्ल्याच्या वेळी सायरन वाजवणे : हवाई हल्ला होणार आहे, हे लोकांना कळावे यासाठी सायरन वाजवणे आवश्यक आहे.
२. नागरिकांना प्रशिक्षण देणे : शत्रूने हल्ला केल्यास नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचा बचाव कसा करायचा, याचे प्रशिक्षण देणे.
३. त्वरित ब्लॅक आऊट करणे : हल्ला झाल्यास त्वरित लाईट बंद करण्याची व्यवस्था करणे.
४. महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण : महत्वाची ठिकाणे आणि इमारती लपवण्यासाठीत्यांची व्यवस्था करणे. म्हणजे, त्या ठिकाणांवर शत्रूची नजर पडणार नाही, अशा प्रकारे ती जागा झाकणे.
५. सुरक्षित स्थळी जाण्याचा सराव : संकट आले तर लोकांना सुरक्षित ठिकाणी कसे घेऊन जायचे, यासाठी आधीच सराव करणे.
सायरन वाजला तर काय करावे?
> ज्या वेळेस सायरन वाजतो तेव्हा सगळ्यात आधी लाईट बंद केली गेली पाहिजे. जर लाईट चालू असेल तर शत्रू विमानांना आपल्या परिसरातील टार्गेट दिसण्यास मदत होईल.
> दुसरा सायरन वाजला की लोकांनी आपल्या बिल्डिंग मधून खाली यावे. जरी हवाई हल्ला झालं तरी नुकसान होणार नाही.
> इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बंद करावे.
> आग लागणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवावे लागतात. बाहेर पडण्यासाठी कोणते मार्ग आहे हे देखील पहावं.
> जखमी लोकांना रुग्णालयात कसं पोहोचावं हे देखील पहावं आणि या सगळ्यांचा सराव करणे आवश्यक आहे.
=======
हे देखील वाचा : Walk : सकाळी अनवाणी गवतावर चाला आणि ‘हे’ चमत्कारिक फायदे मिळवा
=======
सायरन कुठे बसवणार?
> सरकारी इमारत
> प्रशासकीय इमारत
> शहरातील मोठ्या बाजारपेठा
> पोलीस मुख्यालय
> लष्करी तळ
> अग्निशमन केंद्र लष्करी तळ
> पिंच पॉइंट
सिव्हिल मॉक ड्रिलमध्ये कोण कोण आहेत?
> होमगार्ड्स
> महाविद्यालयीन विद्यार्थी
> राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)
> जिल्हा दंडाधिकारी
> स्थानिक प्रशासन
> नागरी संरक्षण वॉर्डन
> पोलीस कर्मचारी
> राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)
> नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS)
महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी मॉकड्रील होणार
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
=======
हे देखील वाचा : Virginia Giuffre : ब्रिटीश राजघराण्याला हादरवणारे स्कॅंडल !
=======
रस्ट सायरन म्हणजे काय?
“रस्ट सायरन” हा एक प्रकारचा सायरन आहे जो आपत्कालीन परिस्थितीत किंवा धोकादायक परिस्थितीत लोकांना सतर्क करण्यासाठी वापरला जातो. हा सायरन मोठ्या आवाजाने वाजतो आणि त्याचे ध्वनी चक्रीय स्वरूपात असतात, म्हणजे आवाज हळूहळू त्याचा आवाज वाढतो आणि नंतर हा आवाज कमी होतो.
रस्ट सायरन का वाजतात?
> आपत्तीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत रिंग्ज
> मोठ्या आवाजाची सूचना देणारी यंत्रणा
> गंजलेले सायरन अधिकाधिक जोरात वाजत आहेत
> २ ते ५ किमी पर्यंत ऐकू येते.
> १२० ते १४० डेसिबलचा आवाज करतो.
> ध्वनीला एक चक्रीय नमुना आहे.
> आवाज हळूहळू मोठा होतो आणि नंतर कमी होतो.