Home » WAVES : वेव्हज समिट : ‘पुष्पा 2’ सिनेमाने बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य

WAVES : वेव्हज समिट : ‘पुष्पा 2’ सिनेमाने बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य

by Jyotsna Kulkarni
0 comment
WAVES
Share

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज समिट (WAVES 2025) अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट सुरु आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमामध्ये भारतातील अनेक मोठे स्टार सहभागी होणार असून विविध विषयांवर ते आपले विचार व्यक्त करताना दिसणार आहे. याच समिटमध्ये पॅन इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुनने देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये अल्लू अर्जुनने अनेक प्रश्नांना मुक्तपणे उत्तरे देत त्याचा प्रवास आणि भावना व्यक्त केल्या. टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांनी त्यांच्याशी संवाद साधला. (Wave)

त्यावेळी अल्लू अर्जुनने ‘टॅलेंट बियॉन्ड बॉर्डर्स’ या विषयावर चर्चा केली. यावेळी त्याने WAVES साठी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ‘पुष्पा 2’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मागील ६ महिन्यांत त्याच आयुष्य किती बदललं असा प्रश्न बरुण दास यांनी अल्लू अर्जुनला विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना, अल्लू अर्जुन म्हणाला, “आता सगळे लोकं माझ्या चेहऱ्याला आणि मला ओळखतात. मी एक प्रादेशिक अभिनेता आहे, पण ‘पुष्पा’मुळे मला संपूर्ण जगात ओळख मिळाली. माझे पुष्पा मधील त्याच्या कामाचे तर खूप कौतुक झालं.” (Marathi Latest News)

वेव्हज समिटमध्ये (WAVES 2025) त्याने एक किस्सा देखील सांगितला. हा किस्सा सांगताना तो म्हणाला, “एकदा माझा अपघात झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी मला ६ महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. ती वेळ माझ्यासाठी खूपच खास ठरली. मी माझ्या १० व्या चित्रपटाचे शूटिंग करत होतो, त्यानंतर माझा अपघात झाला, आणि माझा खांदा तुटला. मला आधी एकदा दुखापत झाली होती, एक छोटीशी शस्त्रक्रिया देखील झाली होती. यानंतर मी चौथ्या आठवड्यात लगेच जिमला जाण्यास सुरुवात केली. जेव्हा मी ऑस्ट्रेलियात डॉक्टरकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की मला ६ महिने विश्रांती घ्यावी लागेल.” (Marathi Entertainment News)

WAVES

” डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. कारण तेव्हा मला २ ते ३ महिन्यांत शूटिंग सुरू करायचे होते. त्यावेळी मला जाणवलं की शारीरिक तंदुरुस्तीव्यतिरिक्त, तुम्ही फक्त एकच गोष्ट करू शकता आणि ती म्हणजे प्रत्येक शॉट चांगल्या प्रकारे कसा चांगला देता येईल याकडे लक्ष देणे. त्यानंतर मी प्रत्येक सीनच्या वेळेस माझी स्किल्स वापरून तो उत्तम बनवायचा प्रयत्न करू लागलो. आज देवाच्या कृपेने आणि आशिर्वादाने मला माझ्या २० व्या चित्रपटासाठी पुष्पा सिनेमासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (Social News)

या पुरस्कारामुळे मी मागील ६९ वर्षांत राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरलो. जेव्हा माझा हात तुटला तेव्हा तो काळ मी माझ्या आयुष्यातील सर्वात लो फेज, वाईट काळ मानत होतो, पण तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईन्ट होता.”

मागीलवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा 2’ सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. या सिनेमातील अल्लू अर्जुनचं काम लोकांना कमालीचे आवडले. या चित्रपटाने जगभरात तब्बल १८५० कोटी रुपये कमावले होते. याआधी आलेल्या ‘पुष्पा’ सिनेमाने देखील कोट्यवधींचा बिजनेस करत अफाट लोकप्रियता मिळवली. आता लोकांना या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे. दरम्यान अल्लू अर्जुन लवकरच ‘जवान’ सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या अरुण कुमार उर्फ ऍटलीसोबत ‘AA22xA6’ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा त्याचा २२ सिनेमा असणार आहे. (Marathi Trending News)

=======

हे देखील वाचा : Pakistan : सैंधव मीठ आणि पाकिस्तान !

=======

तत्पूर्वी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (Waves) ची १ मे महाराष्ट्रदिनी मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झालं. शाहरुख खान, आमिर खान, अनिल कपूर, रजनीकांत, रणबीर कपूर यांच्यासह अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड स्टार्सनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. हे समिट ४ मे रोजी संपणार आहे. या दिवसांत आणखी अनेक मोठमोठ कलाकार, सेलिब्रिटी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधणार आहेत. (Marathi Top News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.