Home » Holi : होळी सणाचे महत्व आणि माहिती

Holi : होळी सणाचे महत्व आणि माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Holi
Share

सणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतामध्ये प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण हा साजरा केला जातो. वर्षभर आपण लहान मोठे अनेक सण साजरे करतो. आता काही दिवसात आपण होळीचा सण साजरा करणार आहोत. होळी हा मराठी महिन्यातल्या शेवटचा सण असतो. फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. पहिल्या दिवशी रात्री होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी होते. होळीला भारतामध्ये मोठे महत्व आहे. होळीला धार्मिक महत्वासोबतच वैज्ञानिक महत्व देखील आहे बर का. (Festival)

तसं पाहिलं तर आपण साजरा करणाऱ्या प्रत्येक सणामागे धार्मिक हेतूंसोबतच एक वैज्ञानिक महत्व देखील आहे. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक यांची रचना अतिशय विचारपूर्वक पद्धतीने केल्याचे नेहमीच सिद्ध झाले आहे. आता तुम्ही म्हणाल होळीचा सण साजरा करण्यामागे कोणता वैज्ञानिक हेतू असेल? रंग लावण्यामध्ये काय आले विज्ञान? मात्र असे नाही यामागे देखील अनेक कारणं आहेत. चला आज आपण याच होळीच्या सणाबद्दल माहिती जाणून घेऊया.(Holi)

फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत साजरा होणारा होळीचा सण म्हणजे दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन हे सर्व होळीमध्ये दहन करून चांगली वृत्ती, चांगले विचार आणण्याचा संदेश देणारा सण. या दिवशी माणसं एकमेकांमधील राग रुसवे, द्वेष सर्व विसरून पुन्हा नव्याने त्यांच्या नात्याची सुरुवात करतात. या सणाच्या दिवशी लाकडं, गोवऱ्या गोळा केल्या जातात. आजकाल शहरामध्ये तर हे सर्व विकत घ्यावे लागते, गावात सहज सर्व उपलब्ध होते, असो.(Marathi Top Stories)

Holi

जिथे होळी पेटवायची आहे तिथे मध्ये एक मोठी एरंडाच्या झाडाची फांदी उभी केली जाते. त्याच्या भोवती लाकडं, गोवऱ्या रचतात. त्यावर साखरेची माळ बांधली जाते. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. महिला या होळीची पूजा करतात, तिला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. या होळीच्या अग्नीत नारळ टाकले जाते. असे म्हणतात की, या अग्नीमध्ये भाजलेले पदार्थ जर आपण खाल्ले तर आपण निरोगी राहतो. शिवाय अनेक ठिकाणी मान्यता आहे की, होळीच्या दुसऱ्या दिवशी जर होळीतून निर्माण झालेली राख थंड झाल्यानंतर सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. (Information Of Holi Festival)

होळीचा सण साजरे करण्यामागचे वैज्ञानिक कारण कोणते?
होळी हा सण हा वसंत ऋतूच्या सुरुवातीला येतो. याकाळात हिवाळा संपून उन्हाळा नुकताच सुरु होत असतो. आपला निसर्ग देखील थंडाव्याकडून दाहकतेकडे जात असतो. थंडीमुळे आपले शरीर सुस्त झालेले असते. त्याला पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शरीराला उष्णतेची गरज असते. वसंत ऋतूमुळे आपसूकच वातावरणात हळूहळू उष्णता वाढू लागते. तेव्हा होळीचा हा सण किंवा होळीमुळे निर्माण झालेला अग्नी मानवी शरीराला उष्णता देतो. ही उष्णता मनुष्याला पुन्हा नवीन ऊर्जा देते आणि तो नव्याने काम करण्यासाठी तयार होतो. (Marathi Latest News)

होळीचा सण साजरे करण्यामागचे धार्मिक कारण कोणते?
हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःलाच देव समजायचा. त्याला स्वतःबद्दल मोठा अहंकार निर्माण झाला होता. याच अहंकारामुळे तो देवतांचा तिरस्कार करू लागला. त्याला सृष्टीचे पालनहार असलेल्या, देवाधी देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. त्यानं त्याच्या नगरातील सर्वांनाच विष्णू भक्ती न करता त्याचीच भक्ती करण्याची ताकीद दिली होती. (Trending News)

Holi

मात्र त्याचा आणि त्याची पत्नी कयाधू यांचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता. तो सतत भगवान विष्णूचे नामस्मरण करायचा. त्याची ही भक्ती हिरण्यकश्यपूला अजिबातच आवडत नव्हती. त्याने त्याला अनेकदा असे न करण्यास बजावले. मात्र प्रल्हादाने त्याची भक्ती सोडली नाही. त्याला वाटले जर त्याचा मुलगाच त्याचे ऐकत नाही, त्याच्यावर त्याचा धाक नाही तर तो प्रजेला कसे धाकात ठेवणार? यासाठी त्याने त्याच्या मुलाला घाबरवण्यासाठी विविध प्रयत्न सुरु केले.(Social News)

हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला वेगवेगळ्या प्रकारे घाबरवण्याचा प्रयत्न केला जेणे करून प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना सोडून देईल. मात्र प्रल्हादने न डगमगता त्याची भगवान विष्णूची भक्ती चालूच ठेवली. शेवटी त्याने प्रल्हादाला घाबरवण्यासाठी एक योजना बनवली, आणि त्यानुसार हिरण्यकश्यपूने त्याची बहीण असलेल्या होलिकाला आमंत्रण दिले. होलिकाला वरदान होते की, ती आगीवर विजय प्राप्त करू शकते. आग तिचे काहीही करू शकत नाही, ती आगीत जळू शकत नाही.(Festival of Colours)

===============

हे देखील वाचा : Sugarcane : सगळ्या रसवंती गृहांची नावं कानिफनाथच का असतात ?

Donald Trump : ट्रम्पचा धाक !

==============

राजाने होलिकेला प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद त्याच्या आत्यासोबत आगीच्या चितेवर बसला. तरीही तो भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीनच होता. हळूहळू आगीने पेट घेतला आणि मोठे लोट पसरू लागले. या आगीत प्रल्हाद नाही तर होलिकाच जळायला लागली. असे होताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

तेव्हाच एक आकाशवाणी झाली आणि तेव्हा होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. म्हणूनच तेव्हा प्रह्लादाला नाही तर होलिकेला तिचा जीव गमवावा लागला. त्या दिवशी जसा वाईटाचा चांगल्यावर विजय झाला आणि वाईट वृत्ती जळून भस्म झाली तसंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील दुष्ट आणि वाईट शक्तींचा नाश होतो आणि आपण नव्या उमेदीने जीवांची सुरुवात करतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.