Entertainment : बॉलिवूडमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमा कल्ट सिनेमांपैकी एक असल्याचे मानले जाते. हा सिनेमा 14 डिसेंबर, 2001 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची कथा, गाणी आणि सुंदर ठिकाणांसह सर्वकाही गोष्टी प्रेक्षकांच्या मनाला भावल्या. सिनेमात जया बच्चन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करिनासारखे स्टार्स होते.
सिनेमातील काही गोष्टींवरुन आजही सोशल मीडियात मिम्स तयार केले जाता. पण त्यावेळी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. खासकरुन शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने चाहत्यांची मनं जिंकली होती. या सिनेमात काही भावनिक सीन देखील होते. पण तुम्हाला माहितेय का, सिनेमातील एक सीनच्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातील मंडळींशी बातचीत करणे बंद केले होते. नक्की काय कारण होते हेच जाणून घेऊया…
काय होते कारण
सिनेमाचा असिस्टेंट डिरेक्टर निखिल अडवाणीने एका मुलाखतीत किस्सा सांगत म्हटले की, सिनेमात एक सीन आहे. यामध्ये शाहरुख काजोलशी लग्न करण्यासाठी घरी येतो आणि अमिताभ बच्चन यांना रागाने काहीतरी बोलून जातो. हा सीन फार हीट झाला होता. या सीनमध्ये दोन्ही कलाकारांनी आपला जीव ओतला होता की, प्रेक्षकांनाही आपले अश्रू अनावर झाले होते. अमिताभ बच्चन यांनी सीनेमातील हा सीन आणि अखेरच्या सीनमध्ये शाहरुनखची माफी अमिताभ बच्चन मागताना भावूक संवाद बोलतात. याच सीनसाठी अमिताभ बच्चन यांनी खूप मेहनत केलीच. पण घरातील मंडळींशीही संवाद साधणे बंद केले होते. (Entertainment)
जया बच्चन यांनी केला खुलासा
निखिल अडवाणी यांनी मुलाखतीत असेही म्हटले की, सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या नॅच्युरल अभिनयाने सर्वांना इम्प्रेस केले होते. जया बच्चन यांच्यासोबत या बद्दल बातचीत केली असता तेव्हा त्या म्हणाल्या की, निखिल तुला माहिती नाही…आम्ही सिनेमातील या सीनसाठी अमिताभ बच्चन यांच्याशीही बोललोच नाही.