Monsoon Health Care : देशातील बहुतांश ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. अशातच खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. कारण पावसाळ्यात बहुतांशजणांना खाण्यापिण्याच्या माध्यमातून फूड पॉइजनिंग झाल्याच्या तक्रारी वाढल्या जातात. अशातच पावसाळ्यात कोणत्या फूड्सपासून दूर राहिले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
पालेभाज्या
पावसाळ्यात ओलसरपणा अधिक वाढला जात असल्याने पालक, कोबी, फ्लॉवरसारख्या भाज्या खाणे टाळले पाहिजे. यामध्ये बॅक्टेरिया आणि कीटक वाढण्याची शक्यता असते. अशातच पचनासंबंधित समस्या होऊ शकतात.
रस्त्यावरील उघडे पदार्थ
पावसाळ्यात रस्त्यावरील उघडे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. खरंतर, पदार्थ तयार करताना स्वच्छतेची काळजी घेतली जाते की नाही यावर खरंतर बहुतांशजणांना प्रश्न पडतो. काहींना रस्त्यावरील उघडे पदार्थ पावसाळ्यात खाल्ल्यानंतर फूड पॉइजिनिंग झाल्याची प्रकरणेही समोर येत राहतात.
सी-फूड
पावसाळ्यात सी-फूड खाण्यापासून दूर राहिले पाहिजे. पावसाळ्यात ताजे मासे मिळत नाही. यामुळे पावसाळ्यात मासे, कोलंबी अथवा अन्य सी-फूड खाणे टाळले पाहिजे.
तळलेले आणि मांसाहारी पदार्थ
भजी, तेलकट पदार्थ अथवा मसालेदार मांसाहारी पदार्थ पावसाळ्यात खाणे टाळले पाहिजेत. यामुळे पचनक्रिया बिघडली जाऊ शकते. अशातच बाहेरुन मागवलेले तळलेले पदार्थ आपल्यासोबत काही आजारपणही मागे आणू शकते. म्हणूनच घरच्याघरी तयार केलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त पावसाळ्यात मांसाहरी अधिक करु नये. घरी चिकन अथवा मांसाहार पदार्थ तयार केला असल्याच पुढील काही दिवसांसाठी खाण्यासाठी अजिबात ठेवू नका.