हिंदू धर्मातील प्रत्येक सणाला अतिशय महत्व आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्यात एक सण तरी पती – पत्नीच्या नात्याला समर्पित असतो. पती पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास आणि आदरावर आधारित असते. या नात्यात एकमेकांचा आधार घेणे, अडचणीत साथ देणे आणि आनंदी क्षण एकत्र अनुभवता येतात. जगातील अतिशय सुंदर नाते म्हणून पती पत्नीच्या नात्याला ओळखले जाते. हे नाते जपण्यासाठी, एकमेकांची साथ कायम राहावी, सुख दुःखात कायम ते सोबत राहावे यासाठी स्त्रिया कायम देव धर्म, विविध व्रत वैकल्य करतात. पती पत्नीच्या नात्याला समर्पित असलेला महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. (Vat Savitri Vrat)
खासकरून महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा वटपौर्णिमेचा सण हा प्रत्येक महिलांसाठी खूपच खास असतो. पतीला निरोगी दीर्घायुष्य मिळावे आणि पती पत्नीचे नाते शेवटपर्यंत टिकावे आणि त्यांची साथ राहावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या दिवशी सुवासिनी महिला, वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्याला सुत गुंडाळतात. या झाडाची पूजा करण्यामागे देखील एक मोठी कथा सांगितली जाते. आपल्या पुराणानुसार वटपौर्णिमा साजरी करण्यामागे सत्यवान आणि सावित्री यांची एक कथा आणि महत्व सांगितले आहे. (Marathi News)
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला खास महत्त्व असते. या पौर्णिमा वेगळ्या नावाने देखील ओळखल्या जातात. वर्षभरात १२ पौर्णिमा येतात आणि या पौर्णिमा तिथीला उपवास केला जातो. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून पतीला कुटुंबाला आरोग्य संपन्न आयुष्य, धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे मागणे मागतात. (Top Stories)
वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत. मात्र तीन दिवस व्रत- उपवास करणे शक्य नसल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरुन तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाल्या जातात मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. त्यानंतर पाच अर्धे घ्यावीत, मग सावित्रीची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. (Marathi Todays Headline)
वटपौर्णिमा पूजा साहित्य:-
हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी (काळी पोत), अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.
वडाच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या. ५ सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. या दिवशी सोळा अलंकार करावेत. या व्रतानंतर घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. वट सावित्री व्रतानंतर फळे, धान्य, कपडे इत्यादी एका टोपलीत ठेवा आणि ते गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा. पूजा झाल्यानंतर पुढील श्लोक म्हणावा. (Marathi Latest News)
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।
वटवृक्षाची पूजा का केली जाते?
वटवृक्ष दीर्घकाळ अक्षय राहतो, म्हणून त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हणतात. त्यामुळेच हिंदू धर्मात या झाडाला पूजनीय मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वटवृक्षात वास करतात. भगवान विष्णू वटवृक्षाच्या खोडात वास करतात असे मानले जाते. मुळात ब्रह्मदेव वास करतात असे मानले जाते. भगवान शिव शाखांमध्ये वास करतात. वटवृक्षाच्या लटकलेल्या फांद्या हे सावित्रीचे रूप मानले जाते. (Top Marathi Headlines)
वटसावित्री व्रताचे महत्त्व
वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात, यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते.
* वट पौर्णिमा २०२५ : तारीख आणि वेळ
वट पौर्णिमा तारीख : १० जून २०२५
वट पौर्णिमा तिथी सुरू : सकाळी ११:३५ वाजता
पौर्णिमा तिथी संपते: ११ जून दुपारी १:१३ वाजता
* वट पौर्णिमा शुभ मुहूर्त
वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त : सकाळी ११:५५ ते दुपारी १२:५१ पर्यंत
या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजा विधी सुरू करणे शुभ मानले जाते.
पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे.
* वट पौर्णिमा कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. (Latest Marathi Headline)
=========
हे देखील वाचा : Ashok Khemka : ३४ वर्षात तब्बल ५७ वेळा बदली झालेले IAS अधिकारी अशोक खेमका
=========
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले.
पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. (Social News / Updates)