मध्य पूर्वेत सुरु असलेल्या इस्रायल-इराणच्या युद्धामुळे निर्माण झालेला तणाव आता टोकाला पोहोचला आहे. चर्चेने वाद सोडवण्याचा प्रयत्न देखील फसला आहे. दोन्ही देशांपैकी कोणी मागे हटायला तयार नाही. मुख्य म्हणजे या युद्धामध्ये आता अमेरिकेने उडी घेतली असून हा वाद आता अधिकच चिघळला आहे. अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर विमानांनी शनिवारी रात्री इराणमधील तीन महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्रांवर ‘बंकर बस्टर’ बॉम्ब हल्ले केले. याच हल्ल्यांमुळे इराण आता आधीच पेटून निघाला आहे. त्यामुळे हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणच्या संसदेने २२ जून रोजी हॉर्मुझ खाडी पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. इराणच्या या मोठ्या निर्णयामुळे संपूर्ण जगात आता भीषण तेल संकट निर्माण झाले आहे. (Iran)
इराणच्या संसेदने अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय कॉरिडॉर हॉर्मुझ कॉरिडॉर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा गंभीर परिणाम आता जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यामुळे जगभरात क्रूड ऑईलच्या किमती वाढतील. यासह इतर वस्तू देखील महाग होतील. या बंदीमुळे जागतिक तेलपुरवठा साखळी पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर आहे. भारताची कच्च्या तेलाची सर्वात जास्त गरज गल्फ देशांतूनच पूर्ण होते. त्यामुळे या बंदीचा मोठा परिणाम भारतावर होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब अजून झालेलं नाही. मात्र जर हा निर्णय अंतिम झाला तर याचा भारतासोबतच जगभरातील इतर अनेक देशांवर मोठा परिणाम होऊ शकतो. (Marathi News)
हॉर्मुझ कॉरिडॉरचे महत्त्व
पर्शियन समुद्र आणि गल्फ ऑफ ओमान दरम्यान कार्गो जहाजांसाठी हॉर्मुझ हा छोटा आणि अरुंद मार्ग आहे. असे असले तरी सामरिक दृष्टिकोनातून हा मार्ग अतिशय महत्वाचा जलमार्ग आहे. हा जलमार्ग इराण आणि ओमान तसेच संयुक्त अरब अमीरात यांच्यामध्ये असून, फारसच्या उपसागराला ओमानच्या खाडीमार्फत अरबी समुद्राशी जोडतो. सध्याच्या युद्धाच्या काळात देखील न चुकता या मार्गावरून दररोज जवळपास २ कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक या खाडीतून केली जात आहे. (Todays Marathi Headline )
याच मार्गावरून संपूर्ण जगातील सुमारे २५% कच्च्या तेलाची वाहतूक होते. ही २५ टक्के तेल वाहतूक सऊदी अरेबिया, कुवेत, यूएई, इराक आणि कतारसारख्या देशांमधून होते. खासकरुन कतारमधून निर्यात होणारी एलएनजीही याच मार्गे जाते. जर, हा मार्ग बंद झाला तर कार्गो जहाजांना त्यांचा मार्ग बदलून प्रवास करावा लागेल. वाहतुकीच्या खर्चात वाढ होईल. नव्या मार्गाने जायचे असल्याने अधिक वेळ देखी लागू शकतो. म्हणूनच या खाडीला किंवा या जलमार्गाला जागतिक महत्त्व आहे. (MArathi Latest NEws)
भारतावर याचा परिणाम होईल का?
याचा भारतीय तेल बाजारावर थोड्याफार प्रमाणात परिणाम दिसू शकतो. इराण आणि इस्त्रायल संघर्षात हॉर्मुझ कॉरिडॉर बंद करण्याचा निर्णय इराणने जरी अंतिम केले तरी भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. येतेच भटकेही दूरदृष्टी वाखाणण्याजोगी ठरते. भारताने ही शक्यता आधीच ओळखली होती. म्हणूनच भारत आता मध्य पूर्वेतून क्रूड ऑईल खरेदी करण्यापेक्षा रशिया आणि अमेरिकेकडून तेल अधिक आयात करत आहे. होर्मुज बंद झाल्याने देशाच काही नुकसान होणार नाही. (Top Stories)
भारताने पुढचे अनेक आठवडे पुरेल इतके तेल साठवून ठेवले असल्याचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले आहे. होर्मुजची खाडी बंद झाल्यास चीनलाच सर्वात जास्त फटका बसेल. कारण चीन जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन एडमिनिस्ट्रेशननुसार, २०२४ मध्ये चीन प्रतिदिवस ४.३ मिलियन बॅरल कच्चा तेलाच प्रोडक्शन करत होता आणि ११.१ मिलियन बॅरल आयात करायचा. (Social News)
=========
हे देखील वाचा : America : अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये इराणचे अणू प्रकल्प उध्वस्त, काय आहे बंकर बस्टर बॉम्ब?
Reza Pahlavi : इस्रायल-इराण युद्धात राजकुमाराची एन्ट्री !
=========
होर्मुजची खाडी बंद झाल्याचा परिणाम जगभरातील विविध देशांवर होईल, याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील होईल. यामुळे अमेरिका आणि इस्त्रायल कोणत्याही परिस्थिती त्यांच्या हवाई ताकदीचा वापर करुन हॉर्मुझ कॉरिडॉर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करतच राहतील. यूरोपियन देश देखील हॉर्मुझ कॉरिडॉर सुरु ठेवण्याच्या बाजूनेच आहेत. कारण इराणच्या संसदेत हॉर्मुझची खाडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यास इराण इस्त्रायल युद्ध अधिकच भीषण होईल. (International News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics