Home » Chardham : चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते?

Chardham : चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Chardham
Share

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चारधाम यात्रेचा देखील शुभारंभ झाला. आपल्या हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. अतिशय पवित्र असणारी चारधाम यात्रा प्रत्येकाने आयुष्यात केलीच पाहिजे असे नेहमीच सांगितले जाते. ही चारधाम यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात. ही अतिशय अवघड समजली जाते. शास्त्रांनुसार, चार धामचे दर्शन घेतल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात. (Chardham)

जी व्यक्ती चारधाम यात्रा करते ती जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होते, त्या व्यक्तीला पुन्हा या नश्वर जगात जन्म घ्यावा लागत नाही आणि त्याला मोक्ष मिळतो. चारधाम यात्रेचा हा प्रवास व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासातही मदत करतो. धार्मिक मान्यतेनुसार, बद्रीनाथ धामला विश्वाचे आठवे वैकुंठ असेही म्हटले जाते. भगवान विष्णू येथे सहा महिने विश्रांती घेण्यासाठी येतात. तसेच भगवान शंकर केदारनाथ धाममध्ये विश्रांती घेतात. चारधाम यात्रेची सुरुवात नेहमीच यमुनोत्रीपासून केली जाते. मग यमुनोत्रीपासून चारधाम यात्रेची सुरुवात का केली जाते? यामागे नक्की कोणते कारण आहे चला जाणून घेऊया. (Marathi News)

Chardham

=======

हे देखील वाचा : Mock Drill : देशात होणाऱ्या मॉक ड्रिलची इत्यंभूत माहिती

=======

चारधाम यात्रा घड्याळातील काट्याच्या दिशेने पूर्ण करावी असं मानलं जातं, म्हणून ती यमुनोत्रीपासून सुरू होते. यामागे धार्मिक कारणं देखील आहेत. यमुनोत्री हे ठिकाण यमुना नदीचे उगमस्थान आहे. धार्मिक मान्यतेनुसार, यमुना नदी ही यमराजाची बहीण आहे जी भीतीपासून मुक्तता प्रदान करते. एका पौराणिक कथेनुसार, एकदा यम भाऊबीजच्या दिवशी त्याची बहीण यमुनाला भेटायला गेला. यमराजांनी त्यांची बहीण यमुनाला आशीर्वाद दिला होता की जो कोणी तिच्या पाण्यात स्नान करेल, त्याचे पाप नष्ट होतील, तो मृत्युच्या भयातून मुक्त होईल आणि त्याला मोक्ष मिळेल. म्हणून, यमुनोत्री येथे पापांपासून मुक्ती मिळाल्यानंतरच चार धामचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. (Marathi Trending News)

दुसरे कारण म्हणजे जुनी परंपरा. प्राचीन काळी ऋषी, महात्मे आणि संत देखील यमुनोत्री येथून आपला प्रवास सुरू करत असत. तेव्हापासून आजतागायत हा क्रम सुरू आहे. लोक याला परंपरा मानतात आणि अशा प्रकारे प्रवास पूर्ण करतात. असे म्हटले जाते की यमुनोत्री येथून चारधाम यात्रा सुरू करणे ही केवळ एक परंपरा नाही, तर त्यामागे खोल धार्मिक श्रद्धा, सुज्ञपणे निवडलेली दिशा आणि वर्षानुवर्षे जुनी भक्ती आहे. (Marathi Latest News)

Chardham

मान्यतेनुसार, यमुनोत्री येथून प्रवास सुरू केल्यास भाविकांना चारधाम यात्रेत कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. शास्त्रांनुसार, पश्चिमेकडून पूर्वेकडे धार्मिक यात्रा करणे शुभ असते. पश्चिमेकडून पूर्वेकडे घड्याळाच्या दिशेने प्रवास करणे शुभ मानले जाते. म्हणून, चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्री येथून केली जाते. यमुनोत्रीमध्ये स्नान केल्यानंतर, भाविकांनी पुढे जावे. (Social News)

=======

हे देखील वाचा : Walk : सकाळी अनवाणी गवतावर चाला आणि ‘हे’ चमत्कारिक फायदे मिळवा

=======

पवित्र असण्यासोबतच, यमुनोत्री ही आध्यात्मिक उन्नती देणारी नदी मानली जाते. यमुनोत्रीमध्ये स्नान करून भाविकांना आध्यात्मिक शुद्धी मिळते. मन शांत आणि प्रसन्न होते. येथे आपले मन शुद्ध करून, भक्त आध्यात्मिक मार्गावर देखील प्रगती करतात. यानंतर, केदारनाथ आणि बद्रीनाथची उंच चढाई देखील त्यांना सोपी वाटते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.