बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.ओडिशातल्या पुरी येथे जगन्नाथ रथयात्रा उत्सव सुरू होता. जय जगन्नाथच्या जयघोषाने संपूर्ण पुरी दुमदुमलं होतं. रथ यात्रेत तीन रथ म्हणजे भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचे रथ घेचले जात होते. अशातच एक माणूस विसकटलेले केस, अस्ताव्यस्त कपडे, आणि आपल्या धुंदीत मग्न. त्यामाणसाने त्या तीन रथांपैकी एकावर चढायचा प्रयत्न केला. पण पूजाऱ्यांनी त्याला ढकललं आणि काहीतरी बोलून हाकलून लावलं. तो माणूस हकल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर गेला आणि वाळूत त्याने तीन रथ बनवले. आणि मग काय? रथ यात्रेत जे रथ ओढले जात होते, ते अजिबात हलत नव्हते. माणसं, हत्ती, घोडे सगळ्यांनी रथ घेचण्याचा प्रयत्न केला पण रथ जरा सुद्धा हलले नाहीत.(Jagannath Temple History)
असं म्हणतात की स्वतः भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा त्या माणसाने बनवलेल्या वाळूच्या रथांमध्ये येऊन बसले. हे रथ बनवले होते भक्त बलराम दास यांनी. भक्त बलराम यांनी बोलवल्या मुळेच त्यांनी आपली रथयात्रा थांबवली होती. आता ही एक आख्यायिका आहे. पण अशा अनेक चमत्कारिक आणि रहस्यमय गोष्टी जोडलेल्या आहेत. पुरी इथे असलेल्या जगन्नाथ मंदिराशी! शेकडो वर्षांपासून इथे भव्य-दिव्य रथयात्रादेखील निघते. नुकतंच इथे वार्षिक स्नान पौर्णिमा उत्सव पार पडला. हा विधी जगन्नाथ रथयात्रा उत्सवाची औपचारिक सुरुवात म्हणून ओळखला जातो. या विधीनंतर भगवान जगन्नाथ १५ दिवसांसाठी आजारी पडतात असं म्हटलं जातं. यामागे नक्की कारण काय ? त्याशिवाय या मंदिराचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. आणि कितीही उन असलं तरी या मंदिराची सावलीचं पडत नाही. मंदिराशी संबंधित या गूढ गोष्टींबद्दलच जाणून घेऊ. (Top Stories)
पुरी म्हणजे ओडिशातलं असं ठिकाण जिथे भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचं भव्य मंदिर आहे. हे मंदिर फक्त भक्तीचं केंद्र नाही, तर रहस्यांनी भरलेलं एक आश्चर्य आहे! असं म्हणतात, इथे साक्षात श्रीकृष्ण वास करतात. आणि इथली रथयात्रा? ती तर जगभरात प्रसिद्ध आहे! दरवर्षी इथे आषाढ द्वितीयेपासून आषाढी एकादशीपर्यंत रथयात्रा पार पडते. यावर्षी ही रथयात्रा २७ जून रोजी सुरू होईल आणि ५ जुलैपर्यंत चालेल. पण या रथयात्रे आधी स्नान पौर्णिमेचा उत्सव असतो. जो १२ जूनला पार पडला. तेव्हा भगवान जगन्नाथ तसंच बलराम आणि सुभद्रा यांना १०८ घागरिनमधून स्नान घातलं जातं, आणि मग भगवान १५ दिवस ‘आजारी’ पडतात. याला ‘अनासर’ म्हणतात. या काळात मंदिर बंद असतं, आणि भगवानांना औषधं दिली जातात.(Jagannath Temple History)
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भगवान कसे आजरी पडतात तर त्या मागेही कथा आहे. ती अशी की पुरीमध्ये माधव दास नावाचा एक भक्त राहत होता, जो भगवान जगन्नाथांची पूजा करायचा आणि तिथे मिळणारा प्रसाद खाऊन आपल जीवन जगायचा. एकदा माधव दास यांना खूप ताप आला होता. पण, तरीही त्यांनी अशा परिस्थितीत त्यांची भक्ती कमी होऊ दिली नाही. लोकांनी त्यांना वैद्याकडे जाण्याचा सल्लाही दिला, पण ते म्हणायचे, ‘जेव्हा देव माझी काळजी घेतात, तेव्हा मला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही.’ पण मग, एक दिवशी अचानक ते खूप आजारी पडल्यामुळे बेशुद्ध पडले. तेव्हा स्वतः भगवान त्यांची सेवा करायला आले. जेव्हा ते बरे झाले, तेव्हा त्यांनी विचारलं “तुम्ही माझी सेवा का केली?” भगवान म्हणाले, “मी माझ्या भक्ताला कधी एकटं सोडत नाही. तुझ्या आजाराचे १५ दिवस बाकी आहेत, ते मी घेतो.” तेव्हापासून ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान आजारी पडतात आणि अनासरात राहतात.
त्यानंतर, भगवान जगन्नाथ बरे झाल्यानंतर, नैनासर उत्सव साजरा केला जातो, ज्याला रथयात्रा म्हणतात.(Top Stories)
याचं रथयात्रेशी जोडलेली एक कथा आहे. राजा पुरुषोत्तम देव जे १५ व्या शतकात ओडीशाचे राजा होते. यांना कांचीच्या राजकन्या पद्मावतीशी लग्न करायचं होतं. पण कांचीच्या राजाने त्यांना नकार दिला, कारण पुरीचे राजे रथयात्रेत रस्ता झाडतात. याचा राग आल्याने पुरुषोत्तम देव यांनी युद्ध पुकारलं आणि जिंकलं. ते पद्मावतीला घेऊन परतले. आजही पुरीचे नामनियुक्त राजे रथयात्रेत सोन्याच्या झाडूने रस्ता साफ करतात. थोडक्यात राजा असो वा कोणी, जगन्नाथांसमोर सगळे समान आहेत.(Jagannath Temple History)
जगन्नाथ मंदिरातल्या मूर्तींची खास गोष्ट म्हणजे भारतातील सर्व मंदिरात देवीदेवतांच्या दगडी मुर्ती असतात, मात्र जगन्नाथपुरीमधील या देवांची मूर्ती लाकडापासून बनवलेली आहे. स्कंद पुराणात सांगितलंय की, राजा इंद्रद्युम्न यांनी हे मंदिर बांधलं. त्यांना स्वप्नात भगवान विष्णूंनी सांगितलं की, समुद्रातून एक लाकूड येईल, त्यातून मूर्ती बनवंं. मग ही मूर्ती बनवली स्वत: विश्वकर्मा यांनी. फक्त त्यांनी राजाला एक अट घातली, की मूर्ती पूर्ण होईपर्यंत कोणी पाहायचं नाही. पण राजा जरा जास्तच उत्साही झाला आणि त्याने मूर्ती बनवताना मधेच पाहिलं. मग विश्वकर्माने ती अपूर्ण मूर्ती तशीच ठेवली. आजही जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्राच्या मूर्ती अपूर्ण दिसतात, पण त्यात सुद्धा त्यांचं वेगळेपण आहे.
आणि या तिन्ही मूर्ती दर १२ वर्षांनी बदलल्या जातात.आणि ज्यावेळी हे मूर्ती बदलण्याची प्रक्रिया सुरू असते, तेव्हा संपूर्ण पुरी शहराच्या लाईटस घालवल्या जातात. यावेळी देवळात फक्त मुख्य पुजाऱ्यालाच तेसुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून पाठवलं जातं. ही प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही. चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली, तर त्याचा मृत्यू होतो, अशी इथली मान्यता आहे. या प्रक्रियेदरम्यान एक पदार्थ जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीत ठेवला जातो मात्र हा पदार्थ जिवंत आहे, काहीतरी धडधतंय असं अनेक पुजाऱ्यांनी आपल्या अनुभवातून सांगितलं आहे. असं म्हटलं जातं की, हे श्रीकृष्ण यांचं हृदय आहे. या वस्तूला पुजारी नीलमाधव म्हणतात. भगवान श्रीकृष्ण यांनी आपला प्राण सोडला तेव्हा त्यांचं शरीर पंचतत्वात विलीन झाल पण त्यांचं हृदय अजूनही या जागी आहे आणि हेच हृदय जगन्नाथ यांच्या मूर्तीत आहे, असे इथली लोकं सांगतात.(Jagannath Temple History)
आता मंदिराच्या काही गूढ गोष्टींबद्दल. पहिलं रहस्य आहे ध्वजाचं. आपण सगळे जाणतो, झेंडा हा वाऱ्याच्या दिशेने फडकतो. पण इथला ध्वज? तो नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो! आणि खास गोष्ट म्हणजे, हा ध्वज रोज बदलला जातो. एक पुजारी २१४ फूट उंच मंदिराच्या शिखरावर चढतो, आणि नवीन ध्वज लावतो. असं म्हणतात, जर एक दिवस हा ध्वज बदलला नाही, तर मंदिर १८ वर्षांसाठी बंद होईल! दुसरं रहस्य आहे मंदिराच्या सावलीचं.
==================
हे देखील वाचा : Odisha : भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी का जातात !
==================
या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली कधीच दिसत नाही. मग सूर्य कुठेही असो, सकाळ असो वा संध्याकाळ, सावली गायब असते आणि यामागचं कारण आजही कोणाला माहीत नाही. तिसरं आश्चर्य म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज. मंदिर समुद्राच्या अगदी जवळ आहे. पण मंदिराच्या सिंहद्वारात पाऊल ठेवताच लाटांचा आवाज थांबतो. आणि बाहेर पडताच पुन्हा ऐकू येतो. एक गोष्ट म्हणजे या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही. शिखरावर देखील पक्षी कधीही बसत नाहीत. या मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे.
आणखी एक खास गोष्ट म्हणजे प्रसाद. इथे दररोज लाखो लोक प्रसाद घेतात, पण तो कधी कमी पडत नाही, कधी वाया जात नाही. असं म्हणतात, भगवान विष्णू स्वतः इथे भोजनाला येतात. आणि स्वयंपाकघरातली एक गम्मत? सात भांडी एकमेकांवर ठेवून जेवण शिजवलं जातं, पण वरची भांडी आधी शिजते, आणि खालची नंतर. हे कसं घडतं? हेसुद्धा आजपर्यंत कोणालाही कळलं नाही.(Jagannath Temple History)
हिंदू धर्मात अशीं अनेक रहस्यं आहेत, ज्यांचं कोडं आजही विज्ञान सोडवू शकलं नाही. या सर्व गोष्टी आजही विज्ञानापलीकडच्या आहेत. पुरीच्या मंदिरावर अनेक परकीय आक्रमण झाली होती. मात्र तरीही हजारो वर्षांपासून हे मंदिर आपल्या रहस्यांसह उभं आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics