भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर लॉन्च केला तेव्हा सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. यातली माणसं भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, या आनंदात ते नाचतायत. हा व्हिडिओ आहे बलुचिस्तान मधल्या बलोच लोकांचा. हा बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानमधला सर्वात मोठा प्रांत. आता पाकिस्तानचा प्रांत असला तरी ते पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यावर ते खुश का आहेत? असा प्रश्न पडतोच… तर त्याला इतिहासच तसा आहे. भारत-पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा बलुचिस्तानने वेगळ्या देशाची मागणी केली होती. त्यासाठीचा त्यांचा लढा गेली ७७ वर्ष सुरू आहे. काय आहे तो इतिहास आणि त्यांना पाकिस्तानपासून का वेगळं व्हायचंय जाणून घेऊ. (Balochistan)
१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी, बलुचिस्तान चार रियासतींमध्ये विभागलेला होता. कलात, खारन, लास बेला आणि मकरान. या रियासतींच्या समोर काही ऑप्शन होते. एक तर भारत किंवा पाकिस्तानात सामील व्हायचं नाहीतर कोणत्या देशात सामील व्हायचं नाही तर स्वतंत्र राहायचं म्हणजे आपला स्वतंत्र देश तयार करायचा… कलात, रियासत, जी बलुचिस्तान मधली सर्वात मोठी रियासत होती, त्यांनी स्वातंत्र्याचा मार्ग निवडला. कलातचे खान… मीर अहमद यार खान, यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश बनवण्याची घोषणा केली. (Balochistan)
४ ऑगस्ट १९४७ ला दिल्लीत एक बैठक झाली, ज्यामध्ये लॉर्ड माउंट बॅटन, कलातचे खान, कलातचे मुख्यमंत्री आणि मोहम्मद अली जिना एकत्र होते. तेव्हा असं ठरलं की, कलात स्वतंत्र असेल आणि याच दिवशी, कलात आणि पाकिस्तान यांच्यात ‘स्टँडस्टिल करार’ झाला, ज्यामध्ये पाकिस्तानने कलातला स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून मान्यता दिली. पण हे स्वातंत्र्य त्यांच्याकडे फक्त २२७ दिवसंच टिकलं. कारण ब्रिटिशांनी एका निवेदनात सांगितलं की, कलात म्हणजेच बलुचिस्तान आंतरराष्ट्रीय जबाबदऱ्या पेलण्यास योग्य नाही. मग पाकिस्तानने त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली. पाकिस्तान सैन्याने बलुचिस्तानमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली. त्यांनी बलुचिस्तानला जबरदस्ती पाकिस्तानात सामील करून घेतले असं आजही बलुचिस्तानातील लोकं म्हणतात.(Balochistan)
आजही बलुचिस्तान त्यांच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान विरोधात लढतोय. २००४ मध्ये बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर बरेच हल्ले चढवले. पण त्यावर पाकिस्तानने त्यांच्यावर बराच दबाव आणला. त्यांच्यावर दहशतवादी हल्ले चढवले. जे अजूनही सुरूच आहेत. सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने बरेच दहशतवादी कॅम्प उडवले. यावर बलुचिस्तानातील स्थानिकांनी भारताला आमचा सपोर्ट आहे असं सांगितलं. बलुचिस्तानकडून भारताला सपोर्ट करण्यामागचं कारण म्हणजे भारत आणि बलुचिस्तानचा एकच शत्रू आहे, तो म्हणजे पाकिस्तान. भारत स्वतः पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे त्रस्त आहे म्हणून त्यांना वाटतं की त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भारत त्यांना सपोर्ट करेल. बलुचिस्तान आणि भारत यांच्यात संबंध जरी कमी असले तरी तिथले नेते असा दावा सांगतात की, प्राचीन काळात त्यांचे भारताशी संबंध होते. (Balochistan)
==============
हे देखील वाचा : War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक
==============
आजही तिथे हिंदू लोकं राहतात. त्यांची लोकसंख्या आता ०.५% आहे. बलुचिस्तानातील हे हिंदू क्वेटा,सीबी लोराराई आणि ग्वादर या ठिकाणी राहतात. तिथे हिंदूंचं हिंगलाज माता मंदिर देखील आहे. या बलोच लोकांमध्ये एक जात आहे ती म्हणजे बुगटी मराठा… या जातीची लोकं त्याचं मराठ्यांचे वंशज आहेत, जे पानिपतच्या तिसऱ्या युद्धात लढले होते. अहमद शाह अब्दालीने काही मराठ्यांना बंदी बनवून नेलं होत. त्यातील काही जण या बलोचमध्ये आणण्यात आले. नंतर त्यांनी इस्लाम स्वीकारला, पण त्यांची परंपरा, त्यांची संस्कृती, त्यांचे काही शब्द… अशा अनेक गोष्टी आजही मराठ्यांसारखेच आहेत. याचा आम्ही एक डिटेल व्हिडिओ केला होता, तो तुम्ही आमच्या channel वर पाहू शकता. एकंदरीत याच बलुचीस्तानला आता पाकिस्तानकडून स्वातंत्र्य हवय आणि म्हणूनच ही लोकं आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तानवर दबाव टाकत आहे. जेणेकरून आता तरी बलुच एक देश म्हणून अस्तित्वात येईल.