Home » प्रो कबड्डी (Pro Kabaddi) : कबड्डी कबड्डी… काय आहे कबड्डी खेळाचा इतिहास?

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) : कबड्डी कबड्डी… काय आहे कबड्डी खेळाचा इतिहास?

by Correspondent
0 comment
Pro Kabaddi: History of Kabaddi Marathi info
Share

सध्या प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगमुळे कबड्डी हा खेळ सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. असे नाही की कबड्डी हा खेळ प्रसिद्ध नव्हता, पण प्रो कबड्डी लीगमुळे त्याला विशेष  प्रसिद्धी मिळाली आहे. हा सांघिक खेळ असून प्रामुख्याने भारतात तसेच आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळला जातो. हा खेळ सोपा आणि स्वस्त आहे, तसेच या खेळासाठी विशिष्ट मैदानाची गरज नसते.       

कबड्डी हा खेळ विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उदा. तामिळनाडूतील कबड्डीला चड्डूकट्टू, केरळमध्ये वंडीवडी, आंध्र प्रदेश चेडूगुडू, बांगलादेश हद्दू असे म्हटले जाते. कबड्डी हा शब्द पहिल्या तामिळ शब्द ‘काई-पीडी’ वरून आला आहे, ज्याचा हात पकडण्याचा हेतू आहे, तामिळ शब्दापासून सुरू झालेला कबड्डी हा शब्द उत्तर भारतात अत्यंत प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागात ‘हुतुतू’ या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे.

कबड्डी खेळाचा इतिहास:

या खेळाची नेमकी सुरुवात कधी झाली याबद्दल अजून कोणतंही ठाम मत नाही. याबाबतीत वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात. काहींच्या मते हा खेळ भारतात सुमारे ४००० वर्षांपासून खेळला जात आहे, तर  काहींच्या मते महाभारतामध्ये या खेळाचा उल्लेख असून तो अभिमन्यूच्या काळात खेळला जाऊ लागला. 

इसवी सन १९१८ मध्ये कबड्डीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळाला. यामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा होता. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले, तर १९३६ मध्ये ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. 

१९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झाली आणि कबड्डी खेळण्याचे नियम ठरवले गेले. १९७२ मध्ये ‘बिगिनर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’ या नावाने अशाच संस्थेची पुनर्रचना करण्यात आली. या वर्षी प्राथमिक सार्वजनिक स्पर्धा चेन्नईमध्ये खेळली गेली.

१९९० ला बिजींग येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धांपासून आशिया स्पर्धांमध्ये कबड्डीला समाविष्ट करण्यात आले. विशेष अभिमानाची  गोष्ट म्हणजे कबड्डी हा एकमेव असा खेळ आहे की, यामध्ये पुरूष आणि महिला दोन्ही भारतीय संघाने विश्वचषक कप पटकावला आहे. 

कबड्डीचे संस्थापक कोण आहेत?

आनंद महिंद्रा आणि चारू शर्मा यांनी १९९४ मध्ये ‘मशाल स्पोर्ट्स’ची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी ‘प्रो कबड्डी लीग (pro kabaddi league)’ ही संकल्पना आणली. २०१४ साली त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि प्रो कबड्डी (pro kabaddi) सामने सुरु झाले. त्यांच्या मार्गदर्शक उपक्रमाला ‘स्टार इंडिया’चा पाठिंबा होता.

आनंद महिंद्रा आणि चारू शर्मा

कबड्डीसाठी कशाप्रकारे मैदान असते?

कबड्डी हा खेळ आता पुरूष आणि स्त्रिया दोघेही खेळु लागले आहेत. पुरूषां करता १२.५० मी बाय १० मी. आणि महिलांकरता ११ मी बाय ८ मी. असं आयताकृती मैदान लागतं. या मैदानात शेणखत आणि बारीक चाळलेली माती याचा उपयोग करून सपाट मैदान तयार करण्यात येतं. 

मैदानाच्या मध्यभागी एक रेषा आखली जाते जी मैदानाला दोन सामान भागात विभागते. या दोन भागांना कोर्ट असे संबोधले जाते.प्रत्येक लॉबीच्या दोन्ही बाजूंना राखीव क्षेत्र प्रत्येकी १-१ मीटरचे असते. या क्षेत्राला लॉबी असे संबोधले जाते.तसेच मध्यरेषेपासून सुमारे ३ मीटर अंतरावर एक रेषा असते याला निदान रेषा म्हणजेच त्याला टच लाईन असे संबोधले जाते. 

काळानुरुप पूर्वी केवळ खुल्या मैदानात खेळला जाणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत मॅटवर देखील खेळला जातोय. तरी देखील मातीतला कबड्डीचा खेळ पाहाण्यात जास्त गंमत येते. 

=====

हे देखील वाचा: दी ॲशेस! तब्बल १३९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ॲशेस मालिकेची रंजक कहाणी

=====

कबड्डी खेळाचे नियम किंवा तो कसा खेळला जातो?

१. हा खेळ दोन टीममध्ये खेळला जातो. दोन्ही संघामध्ये सात-सात खेळाडू विभागले जातात. 

२.  जो संघ नाणेफेक जिंकतो त्याला प्रथम अंगण किंवा चढाई करण्याचे ठरवतो. 

३. जो खेळाडू चढाई म्हणजेच समोरच्या संघाला बाद करण्यासाठी जातो तेव्हा त्याला ‘कबड्डी ‘ हा शब्द स्पष्टपणे आणि सलग बोलावा लागतो तसे न केल्यास  पंच त्याला ताकीत देऊन त्यांच्या विरुद्ध संघाला संधी देतो.  

४. जो खेळाडू चढाई करायला गेला आणि त्याला विरोधी संघाने मिळून पकडले तर विरोधी संघाला एक गुण मिळतो. 

५. जेव्हा एखाद्या  संघातील सर्व खेळाडू बाद होतात तेव्हा त्याच्या विरुद्ध संघाला २ गुण अतिरिक्त देण्यात येतात.

६. चढाई करणारा खेळाडू जेव्हा विपक्षी खेळाडूला स्पर्श करेल तेव्हाच तो आणि विपक्षी खेळाडू राखीव क्षेत्रामध्ये (लॉबी) जाऊ शकतात. जर चढाई करणारा खेळाडू विपक्षी खेळाडूला स्पर्श न करता राखीव क्षेत्रामध्ये गेला, तर तो बाद ठरवण्यात येतो.

=====

हे देखील वाचा: एक छोरी सबपे भारी: २०२१ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना

=====

७. प्रत्येक संघामध्ये किमान १० आणि कमाल १२ खेळाडू असणे आवश्यक असते. त्यातील फक्त ७ खेळाडू मैदानात खेळतात. बाकीचे ३ किंवा ५ राखीव म्हणून असतात.

गेल्या काही वर्षांमध्ये प्रो कबड्डी ((pro kabaddi) सामन्यांमुळे या खेळाला एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे. मोठमोठे कलाकार आपली टिम विकत घेत आहेत. यामुळे या खेळाला ग्लॅमर मिळाला आहे. युवा पिढी कबड्डीकडे आकर्षित होऊ लागली आहे. कबड्डीला प्रो-लीगमुळे चांगले दिवस आले असे म्हणायला हरकत नाही.

– स्वप्नील शहा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.