भारत देशातील राजा महाराजांचा इतिहास पहिला की कळून चुकते त्यांनी किती श्रीमंती पहिली असेल. एक वेळ अशी होती जेव्हा राजा महाराजे त्यांच्या साम्राज्यासाठी ओळखले जात होते. त्या काळात सोने, चांदी, हिरे, माणिक,पाचू अशी संपत्ती त्यांच्याकडे होती. इतिहासात ऐषोआरामात राहणाऱ्या काही राजा महाराजांचे वंशज आजही राजविलासात जीवन जगत आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संस्थाने सरकारमध्ये समाविष्ट करून घेण्यात आली. काही संस्थानिकांनी सरकारमध्ये समाविष्ट होण्यास होकार दिला पण तरीही त्यांचा स्वायत्त कारभार चालूच होता. या सर्व राजांचे इतिहासात मोठे योगदान होते. परकीय सत्तांपासून स्वतःच्या साम्राज्याचे त्यांनी धीराने संरक्षण केले होते.
आपण आता अशा राजा महाराजांची माहिती पाहणार आहोत जे सध्याच्या घडीला पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज जपत आहेत. सोबतच पिढीजात चालत आलेल्या श्रीमंतीत ते जीवन जगत आहेत. त्या राजांमध्ये महाराणा प्रताप यांच्या घराण्याचे नाव अग्रक्रमाने पुढे येते. त्यानंतर येतात पृथ्वीराज चौहान आणि आखारवाल घराण्याचे राव तुलाराम.

महाराणा प्रताप
महाराणा प्रताप म्हटलं की डोळ्यासमोर येतो शौर्य आणि पराक्रमी राजा. मेवाड राजघराण्यावर त्यांनी कित्येक वर्ष राज्य केले. जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हा या राजाने स्वतःचे संस्थान मेवाड घराण्यात समाविष्ट केले .
सध्या मेवाड येथे महाराणा प्रताप यांचे २१ वे वंशज राहतात. त्यांचे नाव आहे ‘अरविंदसिंग मेवाड’. भगवंतसिंग मेवाड हे अरविंदसिंग यांचे वडील होते. त्यांनी मेवाड घराण्याचे १९४४ ते १९८४ च्या दरम्यान प्रमुखपद सांभाळले. भगवंतसिंग यांनी ‘एचआरएच हॉटेल ग्रुप’ची स्थापना केली होती. त्यांच्यानंतर अरविंदसिंग मेवाड यांच्याकडे घराचे प्रमुखपद गेले.
अरविंदसिंग यांचे मेयो कॉलेज येथे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्यांनी पुढील शिक्षणासाठी इंग्लंड देशात जाण्याचा निर्णय घेतला. तिकडे गेल्यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिकागो आणि अमेरिकेत काही दिवस नोकरी करून हॉटेल व्यवसायाचा अनुभव घेतला. यानंतर ते भारतात परतले.

====
हे देखील वाचा: इतिहासातील या श्रीमंत मुघल सम्राटांचे वंशज जगत आहेत हालाखीचे आयुष्य
====
भारत देशात आल्यानंतर त्यांनी ग्रुप ऑफ हॉटेल्स या व्यवसायाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यानंतर कच्छच्या राजकुमारीसोबत त्याचा विवाह झाला. अरविंदसिंग याना व्हिंटेज गाड्यांचा शौक आहे. त्यांच्याकडे रोल्स रॉईसपासून मर्सिडीज पर्यंत सगळ्या गाड्यांचे मॉडेल आहेत.
एखाद्या नवीन गाडीच्या उदघाटन कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहतात. महेंद्रसिंग मेवाड हे अरविंदसिंग यांचे मोठे भाऊ आहेत. त्यांच्या मुलाचे नाव लक्ष्यदीप सिंग असून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले आहे.
आखारवाल घराणे – राव तुलाराम
आखारवाल घराण्याचा राजा असणारा राव तुलाराम हा शौर्य आणि राज्यविस्तारासाठी खासकरून ओळखला जातो. पंजाब पासून हरियाणा पर्यंत पसरलेल्या राज्याचा कारभार तुलाराम पाहत असत. तुलाराम हा असा राजा होता ज्याने कधीच हार पत्करली नाही. पुढे राजा तुलाराम यांचा एका युद्धात मृत्यू झाला.

====
हे देखील वाचा: टेस्ला कंपनी जाहिरात का करत नाही?
====
सध्याच्या घडीला त्यांचे वंशज राव इंद्रजित सिंह हे गादी सांभाळत आहेत. त्यांची राजकारणावर चांगली पकड आहे. इंद्रजित यांचे वडील राजा राव बिरेंद्र सिंह हे हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री होते. बिरेंद्र सिंह यांच्या तीन मुलांचे नाव राव इंद्रजित सिंह, राव अजित सिंह आणि राव यादवेंद्र सिंह आहे.
इंद्रजित सिंह हे हरियाणा राज्यातून लोकसभेतून निवडून आले आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्री असून भाजप सरकारमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. राव इंद्रजित सिंह प्रसिद्ध नेमबाज आहेत.
महाराष्ट्रात पण भोसले घराण्याचे वंशज म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले गादी सांभाळत आहेत. भोसले घराणे आजही राजवंशाची जपवणूक करत आहेत.
– विवेक पानमंद