भगवान दत्तात्रय ब्रह्मदेवाचे मानस पुत्र ऋषी अत्री यांचे पुत्र आहेत. यांच्या आईचे नाव अनुसया आहे. विविध ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की, ऋषी अत्री आणि अनुसया यांना तीन पुत्र होते. ब्रह्मदेवाच्या अंशाने चंद्र, महादेवाच्या अंशाने दुर्वासा ऋषी आणि भगवान विष्णूच्या अंशाने दत्तात्रयांचा जन्म झाला. काही ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आहे की, श्रीदत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे सम्मिलित अवतार आहेत. येत्या ४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीचा मोठा उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. हिंदू धर्मामध्ये श्री सद्गुरू दत्तात्रेय यांना मोठे महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेय म्हणजे ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश’ या त्रिमूर्तींचे रूप. ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्रीविष्णू वात्सल्यस्वरूप आणि शिव वैराग्यस्वरूप आहे. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणार्या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे. (Datta Maharaj)
ऋषी अत्री आणि देवी अनुसूया यांच्या पोटी दत्त भगवानांचा जन्म झाला. ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा संगम म्हणजे दत्त महाराज. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असत. श्री दत्त अवलिये होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्री कृष्णांच्या लीलाप्रमाणेच श्रीदत्तात्रयाच्या लीला आहेत. (Shri Guru Datta)
ज्या दत्त महाराजांना संपूर्ण जगाने आपले गुरु मानले होते, त्याच दत्त महाराजांनी आपल्या जीवनात २४ गुरु केले. श्री दत्तात्रयांच्या २४ गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशु-पक्षी यांचाही सहभाग होता. या २४ गुरूंकडून त्यांनी विविध गुण आत्मसाद केले. दत्तात्रेयांनी केलेल्या गुरुंमधून काही सकारात्मक गोष्टी घेतल्या तर काही नकारात्मक गोष्टी घेतल्या. यात वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे याचे ज्ञान त्यांनी जगाला दिले. मग दत्तात्रयांचे २४ गुरु कोणते ते पाहूया. (Datta Jayanti)

=========
Datta Jayanti : दत्त जयंती- श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याचे नियम आणि पद्धत
Datta Jayanti : यंदा दत्त जयंती कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचे महत्व
=========
१. पृथ्वी – गुण: सहनशीलता
पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहिष्णू असावे.
२. वायू – गुण: विरक्ती
वारा थांबत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नये.
३. आकाश – गुण: अचलता
आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार, एक, सर्वांशी समत्व राखणारा, निःसंग, अभेद, निर्मळ, निर्विवाद, अलिप्त आणि अचल आहे. (Marathi News)
४. पाणी – गुण: स्नेहभाव
मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे. कोणाचाही पक्षपात करू नये. पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते. त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी.
५. अग्नि – गुण: पवित्रता
मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारणप्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे.
६. चंद्र – गुण: विकार बाधा न होणे
अमावास्येची सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या पंधरा कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत् आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. (Todays Marathi HEadline)
७. सूर्य – गुण: नि:पक्षपातीपणा
सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून, देश, काल, वर्तमानस्थिती लक्षात आणून निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्यांचा लाभ द्यावा; पण त्याचा अभिमान बाळगू नये.
८. कपोत – गुण: अलिप्तता
जसा बहिरीससाणा कपोताला (कबुतराला) परिवारासहित भक्षण करतो, तसे जो मनुष्य स्त्री-पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो, त्याला काळ भक्षण करतो. यास्तव मुमुक्षूने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे. (Top Marathi Headline)
९. अजगर – गुण: निर्भयता
जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून रहातो आणि ज्या ज्या वेळी जे जे मिळेल ते ते भक्षण करून संतोष पावतो, त्यात अल्प-अधिक किंवा कडू-गोड असा विचार करत नाही, काही काळ खावयास मुळीच मिळाले नाही, तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतांनाही तिचा उपयोग करावयास जात नाही, तद्वत् मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल, ते भक्षण करून, प्रसंगी काही मिळाले नाही, तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे.

१०. समुद्र – गुण: परोपकारी
जसा समुद्र वर्षाकालात अनेक नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतनू (कृश) होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुखोपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःखपरंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये, सदैव आनंदभरित असावे.
११. पतंग – गुण: मोह त्याग
पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्रीविलासाकरता, स्त्रीची लावण्यता आणि युवावस्था पाहून मोहित होतो, तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो. (Marathi Latest News)
=======
Datta Jayanti : दत्त परिक्रमा म्हणजे काय? काय आहे त्याचे महत्त्व
=======
१२. मधमाशी आणि मधुहा – गुण: धनसंचय त्याग
अ. मधमाशी
मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी, उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते. तो ती स्वतःही खात नाही आणि दुसर्या कोणास खाऊ देत नाही. शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन, तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. त्याप्रमाणे जो कृपण महत्प्रयत्न करून द्रव्यार्जन करून त्याचा संग्रह करतो, तो ते द्रव्य अग्नी, चोर किंवा राजा यांनी एकाएकी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो किंवा त्यास अनीतीमान संतती प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपव्यय करते किंवा तो निपुत्रिक मरण पावतो. याप्रमाणे तो कालवश झाल्यावर ते द्रव्य जेथल्या तेथे रहाते अगर भलत्याला प्राप्त होते. मरते वेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो पिशाच किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणार्याला उपद्रव देतो. याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते, हा उपदेश मधमाशीपासून घेऊन द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे.
आ. मधुहा
ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्यावाचून मधाची प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे साधक पुरुषाने चूल, भांडीकुंडी, अग्नी, लाकूड इत्यादी जमवाजमव करण्याची खटपट न करता गृहस्थाश्रम्याच्या घरचे सुसज्ज अन्न मिळवून भक्षण करावे आणि ईश्वरप्राप्तीच्या उद्योगाकडे त्या वेळेचा उपयोग करावा. असे मुमुक्षू गृहस्थाश्रमीजनांचे अन्न खाऊन त्यांचे कल्याणच करतात.
१३. हत्ती – गुण: काम विकारावर वश करणे
हत्ती बलवान असला, तरी त्यास वश करण्यासाठी काष्ठाची एक हत्तिणीमुळे तो खड्ड्यात पडतो. त्याचप्रमाणे स्त्रीसुखास भुलणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो. (Top Marathi News)
१४. भ्रमर – गुण: विषयांत न अडकणे
सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.
१५. मृग – गुण: मोह त्याग
पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही, असा कस्तुरीमृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो. हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये.
१६. मत्स्य – गुण: चवीत न गुंतणे
लोखंडाच्या गळाल्या बांधलेला मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे मनुष्य जिव्हेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म-मरणरूपी भोवर्यात गोते खात राहतो. (Latest Marathi HEadline)
१७. पिंगला वेश्या – गुण: आशेचा त्याग
एके रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगला वेश्येकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले. अंगी आशा प्रबल असल्याने सुखनिद्रा लागत नाही. म्हणून आशेचा त्याग करणार्याला संसारात एकही दुःख बाधत नाही.
१८. टिटवी – गुण: उपाधीचा त्याग करणे
चोचीत मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात, तिला टोचा मारतात, पाठलाग करतात. शेवटी ती मासा टाकून देते. तोच एक घारी त्याला पकडले आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी मासा उचलणार्या घारीचा पिच्छा पुरवू लागतात. पण आता टिटवी निश्चिंत होऊन जाते. त्याच प्रकारे संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे. (Top Trending News)

१९. बालक – गुण: आनंदी
जग हे प्रारब्धाधीन समजून, मानापमानाचा विचार न करता, सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा.
२०. कंकण – गुण: एकांतवास साधणे
दोन बांगड्या एकावर एक आपटून त्यांचा आवाज होतो. त्या प्रकारे दोन माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र वास करत असल्यास कलह होतो. म्हणून ध्यानयोगादी करणार्याने निर्जन प्रदेश शोधून एकटे राहावे.
२१. शरकर्ता (कारागीर) – गुण: एकाग्रता
एकदा एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता. त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजतगाजत थाटात गेली. नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का? तेव्हा कारागीर म्हणाला की मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही. या प्रकारेच मुमुक्षूने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे. (Top Stories)
२२. सर्प – गुण: सावधता
दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत, सावधपणे फिरतात, वाटेल तिथे राहतात, अपकार केल्यावाचून कोप करत नाहीत. त्याप्रमाणे दोन बुद्धिमत्तांनी कधी एकत्र फिरू नये, भांडू नये, परिमित भाषण करावे, स्वतःसाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहावे. घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोभ जडतो.
=========
Datta Jayanti : वाराणसीमध्ये स्थित आहे उत्तर भारतातील एकमेव जागृत दत्त मंदिर
Audumbar Tree : औदुंबर वृक्षाचे महात्म्य आणि कथा
=========
२३. कोळी – गुण: ईश्वरेच्छा
ज्या प्रकारे कोळी घर बनवतो मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छामात्रेकरून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो. म्हणून जगातील घटनांना महत्त्व देऊ नये. (Social News)
२४. भ्रमरकीट – गुण: ईश्वरस्वरुपता
भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणाने परमात्वतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्मरूपास पावतो.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
